Saturday, September 3, 2011

4 th collection -- to select from

सुप्रीम कोर्टाचे तीन महत्वाचे निकाल
1. सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य --- मटा, दि 8 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
2. कार्यक्षम व्यवस्थेसाठी --- मटा, दि 29 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
3. पावले टाकीतच रहायचं आहे --- मटा, दि 15 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
4. हक्कांची जपणूक आणी न्यायबुद्धी --- मटा, दि 22 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली
5. ही तर लक्ष्मीची पाउले
6. युगान्तर घडतांना --- साप्ताहिक लोकप्रभा दि.18.5.2007
7. बलात्काराला फांशीची शिक्षा हवीच --- केसरी दि 1999
8. समाजकारण घसरलं भ्रष्ट अर्थकारण पसरलं -- शब्ददर्वळ दि. 2008
9. प्रशासकीय लेखा-परिक्षण एकांगीच राहिले
10. बदलती जीवनशैली व कुटुंबपध्दती -- जळगांव सकाळ खास अंक दि.11.8.2008 (वृद्धांच्या व्यवस्थेचा प्रश्न अनुत्तरितच)
11. मिठाचे अर्थकारण --- अंतर्नाद .....२००० (जून ? )
12. वादळाचा पाठलाग
1३. मन घडवणारे प्रसंग
14. त्या स्त्रियांच्या सोबतीसाठी म.टा. 21 Sep, 2004
त्याची शरम वाटते? -- मरीन ड्राइव्ह कांड
-----------------------------------------------------------------------
1. हे विकासाचे आव्हान पेलेल कां -- सा विवेक
2. सर्व ओझी निवारणासाठी - क्रिकेट --- लोकसत्ता, मुंबई दि.
3. मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट --- लोकमतसाठी
4. जुहू शेम नंतर - आता तरी --- महाराष्ट्र टाईम्स 21.1.08
5. कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही --- लोकमतसाठी
6. ठावकीच नाही --- महाराष्ट्र टाईम्स दि.
7. सांगलीचे दिवस --- अंतर्नाद,पुणे,
8. सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी --- महाराष्ट्र टाइम्स दि. ----
9. योगत्रयी : आमुख ---
10. कुसुमाग्रजाच्या कविता अनुवाद करताना --- आकाशवाणी पुणे
कुसुमाग्रज हिन्दी कविता आकाशवाणी पुणे वरून
11. स्त्री पुरुष असमतोल - एक इशारा --
12, शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवणे शक्य आहे -- वसंत व्याख्यानमाला, पुणे, 19-5-96. -- दै. केसरी, पुणे, 20-5-96
13. निवडणुकीचे अर्थकारण आवाक्या पलीकडचे
14. उच्च शिक्षणावरील आर्थिक तरतूद -- IIPA, मुंबई, स्पर्धेतील लेख 1992
-----------------------------------------------------------------------------------------------------------
संगणकावर धपाधप मराठी लेखन हेतू -- इनस्क्रिप्ट
योगत्रयी
'त्या' नागपूरी स्त्रियांच्या सोबतीसाठी
मृत्युंजयी सावित्री आणि रुपकुंवरचे सती जाणे
त्याची शरम वाटते
चिंतामण मोरया
बायोडीझेल काळाची गरज -- लोकराज्य जुलै 2006
मन घडवणारे प्रसंग -- अंतर्नाद
भाप्रसे संस्कृती आणि अपसंस्कृती --अंतर्नाद
सुप्रीम कोर्टाचे तीन महत्वाचे निकाल
छोट्या छोट्याच गोष्टी -- स्त्रग्धरा 2002
नहाराष्ट्रांत बलात्काराचे गुन्हे -- लोकमत 2001
स्त्री भ्रूणहत्या आणि आपण -- अंतर्नाद
ठावकीच नाही -- मटा
आत्मसन्मान जपण्यासाठी -- मटा रविवार 8.3.2008
भाप्रसे संस्कृती आणि अपसंस्कृती -- अंतर्नाद
वादळाचा पाठलाग -- लोकमत (की लोकसत्ता)
गुजरात भूकंपानंतर -- लोकसत्ता
काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां -- सकाळ
सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी -- मटा
भाप्रसे पुनर्विचार हवा -- पद्मगंधा दिवाळी
आपण ठाम असलो तर
प्रशासकीय बदल्या -- सत्याग्रही विचारधारा
स्त्री उवाच --
विकासाबरोबरच समाज स्वास्थ्य हवे -- देशदूत
योगत्रयी आमुख
दु़ख विसरण्यासाठी
निसर्गोपचार -- निसर्ग शोभा दिवाळी
दादा -- माझे वडील
सांगलीचे दिवस -- अंतर्नाद 2003
कुसुमाग्रज हिन्दी कविता आकाशवाणी पुणे वरून
मिठाचे राजकारण -- अंतर्नाद
अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर अनिवार्य -- उमवित भाषण -- सकाळ 29.2.2008
शासनाची मागील व पुढील पन्नास वर्ष -- सा. विवेक, दिवाळी 2002
प्रशासकीय बदल्या -- सत्याग्रही विचारधारा 1998
आपण ठाम असलो तर --
* स्त्री पुरुष असमतोल - एक इशारा --
स्त्री भ्रूणहत्या आणि आपण -- अंतर्नाद
शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवणे शक्य आहे -- वसंत व्याख्यानमाला, पुणे, 19-5-96. -- दै. केसरी, पुणे, 20-5-96
विकासाबरोबरच समाजस्वास्थ्य हवे -- देशदूत -- 1996
उच्च शिक्षणावरील आर्थिक तरतूद -- IIPA, मुंबई, स्पर्धेतील लेख 1992
निवडणुकीचे अर्थकारण आवाक्या पलीकडचे
एकविसाव्या शतकांतील प्रसासन -- पद्मगंधा दिवाळी 2000
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

चिंतामण मोरया
... लीना मेहेंदळे

माझ जन्मक्षेत्र धरणगांव, माझ्या आजोबांच्या तरुण वयात हे गांव तालुक्याचे शहर बनू शकेल या क्षमतेच होत. तस झाल नाही कारण गांवाला बारा महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे साधन नाही, नदी नाही म्हणून ब्रिटिश राजवटीत धरणगांव ऐवजी पंधरा किलोमीटर दूर असलेल एरंडोल हे तालुक्याच ठिकाण झाल अगदी अलीकडे - पाच सात वर्षापूर्वी धारणगांव हा वेगळा तालुका करण्यांत आला.
माझा जन्म घरातच झाला. आई सांग ते जेव्हा अस वाटल की आज उद्यात कांही तरी होणार आहे, तेव्हा घरातली सर्वांत मोठी खोली - म्हणजे देवघर रिकामी केली आणी खाट वगैरे टाकून तिथेच तयारी केली. माझी आत्या आणी गांवातली एक सुईण यांनी मिळून बाळंतपण केल. दुपारी दीड दोन ची वेळ होती. वडील नोकरी निमित्त बाहेर होते. आजोबा दुपारच्या जेवणासाठी दुकानातून घरी आलेले. मुलगी झाली समजल्यावर थोडया कष्टी मनाने दुकानात परत गेले. दुपारी त्यांच्या कडे अचानक दोन तरुण आले. साडेतीन हजार रुपये घेऊन. त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधी तरी दुकानातून मोठी उधारी घेतली होती. आर्थिक तंगी मुळे ती फेडायला जमली नव्हती पुढे परिस्थिती सुधारली पण माणूस फार आजारी झाला. त्यातच मरण पावला पण मरतांना बजाऊन गेला 'अरे त्या सज्जान ब्राहमणाचे पैसे बुडवू नका वचन द्या.' म्हणूनच तेरावा उरकल्यावर दोघ मुल पैसे फेडायला माझ्या आजोबांकडे आली होती.
मग तर आजोबांनी लगेच दुकान बंद केल - नवजात नातीसाठी सोन्याची चेन आणी शेजारी पाजारी वाटायला मिठाई घेऊनच आले. बडी बेटी धनाची पेटी अस सर्वांना सांगून टाकल. योगायोग आसा की माझ्या दर वाढदिवसाला आई वडिलांना कुठून तरी लहान - मोठा अवचित धन लाभ होत आलेला आहे रक्कम क्षुल्लकच असायची पण कुठेतरी केलेल्या कष्टाचा राहून गेलेला मेहनताना अस त्याच स्वरुप असायच. माझे वडील उत्तम ज्योतिषी होते - पण पैसे घेत नसत. मात्र आम्ही बिहार मध्ये होतो. तिथे पध्दत अशी होती कि ज्योतिषाला काही तरी द्यावे. तरी तसेच बिहार मध्ये शेती उत्पन्नाची सुबत्ता फार. म्हणून मग वडिलांकडे कधी भाज्या, कधी फळ, कधी मिठाई अशी आणली जायची. असाच काहीसा लाभ माझ्या वाढदिवशी झाला, तर तो माझ्या नांवाने जमा होई.
त्यामुळे जन्मापासून मी आजोबांची अतिशय लाडकी होते. माझ्यावर कधीही हात उगारायचा नाही अशी घरांतील सर्वांना आजोबांची सक्त ताकीद होती. माझ्या सगळयाच सख्ख्या - चुलत - आते भावंडांनी लहान पणी कधी ना कधी मार खाल्लेला आहे. पण मी मात्र थाटात असायची -
आजोबा पंचक्रोशीत हुषार आणि हरिभक्त म्हणून गाजलेले होते. सन् एकोणवीसशे दहा मध्ये त्या काळात प्रतिष्ठेची मानली जाणारी व्हर्न्यक्युलर फायनल (सातवी) परिक्षा पास होऊन आपल्याच शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून लागले. त्यानंतर नोकरी सोडून देऊन गांवातली पहिली लाकडाची वखार टाकली आणि दुकानावर बसू लागले ते एकोणवीसशे पंचावन्न पर्यंत.


त्या काळांत धरणगांव हे प्रत्यक्ष तालुक्याचे ठिकांण नसले तरी गांवाचा रुबाब इतर तालुका शहरांसारखाच होता. धरणगांव ही एक मोठी बाजारपेठ होती. त्या काळांत गांवात सिमेंटचे रस्ते होते. गांवात विणकर समाज फार मोठा होता. तिथे हातभागावर तलम लुगडी, धोतर आणि सतरंज्या विणल्या जात. धरणगांव, धुळे, सूरत अशा तीन मोठया बाजारपेठ त्यांना मिळत. त्यामुळे आजोबांची वखार पण उत्तम चालली - शेजारी अजून कांही वखारी उभ्या राहिल्या. वखारीच्या खरेदीसाठी आजोबा पार कलकत्त्या पर्यंत जात. हे सर्व क्षेत्र गांवठाणाच्या थोड बाहेर, रेल्वे स्टेशनाच्या जवळ होते. निधून थोड पलीकडे चिंतामण मोरयाचे मंदिर होते. उत्तम पाषाण व फरश्यांनी बांधून काढलेल्या या मंदिरातील गणेश मुर्ति - स्वयंभू आहे. या मंदिरात प्रत्येकाच्या मनातली - इच्छा पूर्ण होते असे मानतात. आजोबांच्याही शंभर - दिडशे वर्ष मागे त्या मूर्तीचा जीर्णोद्वार करण्यांत आल्याचा संगमारवरी दगडावर कोरलेला आलेख आहे. लहानपणी आजोबा मला इथे होऊन यायचे. पाढे, स्तोत्र आणि गणित शिकवायचे, अस अंधुक अंधुक आठवत. आजी खूप खूप पूर्वीच वारली घरांत आजोबा, आई, आजोबांच्या धाकटया भावाचा मोठा गोतावळा व शिकण्यासाठी येऊन राहिलेली इतर नातेवाईक भावंड त्या सर्वांना अभिमानाने माझ्या गणितातील प्रगति बद्दल आजोबा बोलून दाखवीत.
मी सात वर्षाची असतांना वडिलांना मध्य प्रदेशात जबलपूर येथे कॉलेज मध्ये लेक्चारची नोकरी मिळाली. तेव्हा आजोबांनी वाटे हिस्से केले. वखार आपल्या धाकटया भावाकडे सुपूर्द केली आणी आम्ही जबलपूरला आलो.
मला शाळेचा पहिला दिवस आठवतो. मला सरळ तिसरी इयत्तेत घेतले होते. तेव्हा तोंडी गणितांची परंपरा होती. आजोबा तर उठ - सूठ तोंडी गणित विचारत आणि गणित सोडवण्याच्या नाना युक्त्या पण सांगत. त्यांना लगेच उत्तर सांगून मी मोकळी होत असे. पण शाळेत तस नव्हत. पाटी वर उत्तरे लिहायची होती. दहा तोंडी गणितांची दहा उत्तर. त्यांत माझा उत्तरे लिहिण्याचा क्रम उलट सुलट झाला आणि माझी तीन उत्तर चुकली. पन्नास पैकी फक्त पस्तीस मार्क. मला रडू कोराळल तेवढयांत मास्तर विचारु लागले सगळयांत जास्त मार्क पस्तीस - ते कोणी मिळवले ? कोण ही नविन मुलगी ? घरी आजोबांना हा किस्सा सांगितला. तेव्हापासून ते पाटीवर उत्तरे लिहायची - सवय करुन घेऊ लागले.
पुढे दोन वर्षांनी आजोबा वारले आणि आम्ही पण जबलपूर मध्य प्रवेश सोडून लांब दरभंगा, बिहार येथे गेलो. मात्र दर वर्षी उन्हाळयाच्या सुटीत धरणगांवला येत राहिलो. आजोबा साळी समाजाच्या सभागृहामध्ये भजन व कीर्तन करीत असत. तिथेच वडिल महिनाभर दररोज सकाळी ज्ञानेश्र्वरी वर प्रवचन करु लागले. हा क्रम अन्याहत पणे सुमारे चाळीस वर्ष चालला.
सुटीत धरणगांवला आल्यावर दररोज चिंतामण मोरयाच्या दर्शनाला जावे हा जणू नियमच ठरुन गेला. तसे गावात इतर ब-याच मंदिरात फेरुटका - मारला जाई पण गावकुसा बाहेर शेत आणि बाभळाच्या बनातून गेलेल्या पायवाटेने चिंतामण मोरयाला जाण्याची ओढ वेगळीच होती. तिथे वेळ असेल त्या प्रमाणे प्रदक्षिणा व अथर्व शीर्षाचा पाठ आम्ही करीत होतो. कधी फक्त एक तर कधी - एकदम एकवीस पर्यंत. तिथे जाऊन मला नेहमी वाटे - याला कांय मागायच ? याला सगळी माहित आहेच. पण इतर जण सांगत - अस नाही म्हणू - या मूर्तीपुढे आपले मन बोलून दाखवले - तर हवे ते मिळते. आजही आमच्या घरांत काही अडले नडले तर पटकन् मोरया, तुला नारळ फोडीन अस म्हटल जात.

दर वर्षी धरणगांवला येणाच्या कार्यक्रमामुळे तिथले रस्ते असे तोंडपाठ की डोळे मिटून किंवा अंधारात चालेले तरी हरकत नाही. आज इतकी वर्ष झाली पण ते सिमेंटचे रस्ते, धाब्याची घरे, दुकान, पिठाच्या गिरण्या, कोट (बाजाराची भली मोठी बांधीव जागा), मंदिर, शाळा वरीचशी झाडे पण तश्शीच आहेत. मात्र चिंतामण मोरयाचा परिसर बदलला. गेल्या दहा वर्षात मंदिराच्या आसपास इतर बरीच मंदिर काढली आणि त्या छोटया परिसराला खेटून खूप घर आणी खूप लोकवस्ती झाली.
आता माझ घरणगावी किंवा मोरयाला फारस जाण होत नाही. पण कुणीतरी धरणगांवचा वारसा सांगणारा संगणक शिकला आणि त्याने चक्क चिंतामण मोरया डॉट कॉम अशी साइट बनवून टाकली. ज्यांनी मोरयाची प्रचीति घेतली आहे असे शेकडो लोक त्याला दुवा देत आपल्या संगणकावर मोरयाचे दर्शन घेत असणार यात मला शंकाच नाही.

----------------------------------