Friday, October 26, 2007

कुसुमाग्रजाच्या कविता ---- अनुवाद

कुसुमाग्रजाच्या काही कवितांचा अनुवाद पहा माझ्या कुसुमाग्रज की कविताएँ या ब्लॉग वर.
http://hindi-kusumagraj.blogspot.com
कुसुमाग्रजाच्या 108 कवितांचा अनुवाद पहा
http://www.geocities.com/hindikusumagraj

Also available on chakori_baheril_prashasan_16/chintaman_moraya
कुसुमाग्रज

माणसाकडे संधी येते आणि खूप उशीरा कळत की आपल्या हातून त्या संधीच चीज करण्याच राहून गेल.
नाशिकला माझ पोस्टिंग झाल्यानंतर लगेचच मी तात्यासाहेबांना भेटायची संधी घेतली. ते फार मोठे कवि आहेत, त्यांनी कांही नाटक पण लिहिलीत (विशेषतः नटसम्राट), ते फार अबोल आहेत, व त्यांचे कांही खास मित्र सोडले तर एरवी संकोची आहेत अशीही समजूत होती. त्यांचे लेख व त्यांच्यावर लेख वर्तमानपत्रांत येत, पण त्यामधे त्यांचे स्वभाषेवरील विचार, शासकीय अनुदाने-बक्षीसे इत्यादि बाबत मते, एवढेच वाचले होते. मला कवितेबद्दल रसिकता आहे पण जे कांही वाचन झालेलं ते बहुतांशी हिंदीतून। त्यांच्या कविता वाचून काढून मग त्यांच्याकडे जाव अस कांही सुचल नाही. त्यामुळे ज्या साहित्य प्रांतात ते एवढे मोठे, त्याबद्दल आपण कांय बोलणार अशी एक शंका मनात होतीच. त्यांची नितांत सुंदर प्रार्थना सर्वात्मका सर्वेश्वरा शाळेत म्हणायची नाही वगैरे वादही तेंव्हा चालू होते. आमची पहिली चर्चा झाली ती आजच्या समाज-मूल्यांवर. देशांतील नागरिकांची जागरूकता आणि प्रबुद्धता कशी बाढवावी, कशी टिकवावी इत्यादि मुद्यांवर. पण ती छोटीशीच चर्चा होती.
त्यानंतर जळगांव स्कॅण्डल च्या निमिताने व नंतरही माझे लेख अधून मधून प्रसिद्ध व्हायचे त्यावेळी कुठून तरी ऐकायला मिळायचे की तात्यासाहेबांना तुमचे लेख आवडतात. पण ही 'सांगोवांगी' वार्ता म्हणून मी कांही मनावर घेतलं नाही.
पुढे त्यांच्या भेटी अधून मधून होत राहिल्या. मधे मी केलल्या एका बंगाली कवितेचा मराठी अनुवाद त्यांना आवडला अस ते म्हणाले. माझ्या आवडीच्या कांही हिन्दी कविता त्यांना ऐकवल्या. मी मधून मधून हिंदीतही लिहिते हे ही सांगून झाल. पण त्यांच्या कविता हिंदीत अनुवादित कराव्या अस कांही वाटल नाही. तेवढी माझी प्रतिभा किंवा तयारी नाही याची जाणीव होती. बहुधा त्या अनुवादित झाल्याही असतील अशी मी समजूत करून घेतली.
आता ते नाहीत. त्यांच्यावर भरभरून येणारे लेख वाचतांना त्यांच्या कविता पुन्हा दृष्टीस पडल्या आणि वाटल, आपण इथे दिल्लीत! या कवितांची कुणाबरोबर चर्चा करायची तर ती माणस हिंदीभाषी! तरी मी कवितांचा गद्य अनुवाद पुष्कळांना ऐकवित होते, आणि वाटल- हे कवितेतही लिहून काढणं जमेल आपल्याला. त्यांच्या गाजलेल्या दोन ओळी पेपरांत वाचल्या --
'समिधाच सखे या, त्यांत कसा ओलावा, तव आंतर अग्नि क्षणभर तरी फुलवावा.'
आणि एक अनुवाद सुचला --
तव आंतर अग्नि चेते यही प्रयोजन'
मूळ कडव मोठ आहे हे कळल्यानंतर त्यांत भर घातली
समिधा सखे, ये करे स्नेह क्यो सिंचन
क्यों पुष्पों के सम दें मधुपान-निमंत्रण
रूक्षता नियति है लिख दी मैंने इनकी
तब आंतर अग्नि चेते यही प्रयोजन !
त्यांच्या कांही कविता अगदी सोप्या असूनही त्यांत एक उत्कटता आहे। एकीचा अनुवाद मी केला --
कविता मेरी
कविता मेरी विजय के लिये कभी न थी
इसीलिए ना चिंता इसे पराजय की
नही जन्म के लिये कभी भी रूठी थी
इसी लिये वह पडी मौन पर भारी थी।
अशाच त्यांच्या दोन छोटया कवितांचा (जीवन लहरी) छान अनुवाद झाला-
सार्थक
माटीके चित्रोंको दिया तूने नाम पता
माटीके चित्रोंको दी भाव-विभोरता
हृदय तेरे सार्थकता प्रगटी जब ऐसे
माटीके चित्रोंने, देव! दिये अश्रु तुझे.
दुसरी मधे वर मागितला आहे-
धर्म
दे मन को निर्भयता, अंतर को भाव-सृजन
प्रज्ञा का दीप जल उज्जवल हो ये जीवन
जुल्म, पाप से बैर, विफलता में अचल धीर
मानवता बनी रहे परम-धर्म-संहिता.
कळीच्या हक्काबद्दल कवितेचा अनुवाद -
कली का हक
हर कली को जन्मसिद्ध हक है, चटखने का
माटी से मिली विरासत को गगन पटल पर लिखने का
खिले शाही उद्यानों में, या मरूभूमि में उजाड
पर हर कली को हक है फूल बनकर खिलने का
हो गुलाब या कमल कली हो, या नाली पर खिली कली
बाट जोहता होता उसकी प्रकाश कण एक सूरज का
हर कली में जिवन्त है, दृढ निश्चय पुष्पित होने का
नखरे नाज दिखाने का और सुगंध बरसाने का
रडगाणी सोडून द्या अस सांगणारी त्यांची एक कविता आहे, आदेश, तिचा हा अनुवाद
आदेश
आओ बैठें,
रोना तो लगा है रोज ही,
पर आज तो
थोडा हंसे।
अंधेरे का कीर्तन
भूल जाये थोडी देर
हृदय पर लगा लें
उजाले के छापे।
तेरे मेरे जीने के
परस्पर जो स्वामी
उन विश्र्वेश्र्वर सूर्य के
आदेश हैं ऐसे।
अर्जुनाला गीता सांगतांना कृष्णाने निर्गुणाची महती गाऊन सगुणदूजकाला मूढ असे म्हटले त्यावर तात्यासाहेबांना केलेल्या कवितेचा हा अनुवाद-
आलंबन
चलो मान लिया,
जब स्वयं श्रीकृष्ण ने कहा-
'जो देखे मानव रूप में'
मुझे, वह मूढ है'
भगवन्, उन मूढों की सूची में
मेरा भी नाम है।
तुम निर्गुण तुम निराकार,
विश्र्वात्मक तुम
अरूप अपार,
जाने मेरी प्रज्ञा जाने,
मन ना माने,
मुझे चाहिये रूप तुम्हारी
सगुण साकार,
जो इन नयनों को दे पहचान
दुर्बलताको धीरज बांधे
मन को दे जो आशास्थान
विश्र्व की इस असीमता में
मेरा जो एकाकीपन
रूप तुम्हारा बना रहे
मेरा आलंबन.
हाँ मूढों की सूची में
नाम मेरा भी है
और साथ एक सांत्वन
जिस अर्जुन के लिये
सुनाई गीता तुमने
सूची में है उस अर्जुन का
अग्रक्रम !
ध्येयासक्ति बाळगणारी माणस ही तात्यासाहेवांचे लाडके हिरो असत. सुखवस्तू माणसाला हा ध्येयवेडेपणा कसा कळणार? अशी एक छानशी अनुवादित कविता आहे 'क्यों'-
क्यों
छोडकर राजगृह क्यों, गौतम वनवास करे?
अपना ही क्रॉस क्यों येशू पीठ पर धरे?

सुकरात भी क्यों विषभरा प्याला लगाये होंठ से?
तत्व च्युत होना नही है, मौत तू लग जा गले!

भूमि धन से विरत कोलंबस चले सागरे के द्वार
उत्तरी ध्रुव की वरफ में खोज कोई क्यों करे?

घास की हो रोटी, सोने को शिलाएँ हों कठिन,
क्यों महाराणा प्रतापी जंगलों में ही फिरे?

पानीपत में हार जब निश्च्िात मराठों की हुई
सदाशिव को छोड जनकोजी न क्यों भागे चले?

रोग संकट कोई ओढे कुष्टरोगी के लिये क्यों?
कोई सरहद पर हिमालय को बचाने क्यो लडे?

करो समझौता सुखों से, रहो घर में चैन से
मंत्र यह जाने न जो, क्यों चतुर उसको हम कहें?

न्यूटन ने म्हटल होत की ज्ञानाचा सागर
अफाट आहे, त्यांत मी वेचतो ते निवळ
वाळू-कणांइतके छोटेसे ज्ञान भांडार आहे.
कुसुमाग्रजांनी देखील अफाट, असीम विश्वांत माणसाचे छोटेसे स्थान या दोन कवितेत मांडून ठेवले आहे-
रहिवासी
रहिवासी तो हैं ही हम
मली मुहल्ले, गांव के,
और अपने प्रांत के,
और अपने देश के।

लेकिन यह याद रहे
कि रहिवासी भी है हम
सौर मंडल में,
पृथ्वी नामक ग्रह के।

और वह ग्रह भी जहाँ बालू कण जैसा
क्षुद्र
उस असीमित विश्र्व के।

दुसरी कविता थेंब अशी आहे-
जीवन
अनंतताका गहन सरोवर
मंझधारे में विश्र्वकमल है,
खिला सनातन।

कमल पंखुडी पर
पडा हुआ है,
एक ओस-कण।

उसके झिलमिल कंपन को
हम धरती के वासी मानव,
कहते जीवन !

आज दोपहर
यह पंछी तो, बैठा मेरे सम्मुख था, आज सकारे।
उषःकाल के नभ का टुकडा, उतर पडा था मेरे द्वारे।
अगम शक्ति ने, दान दिये जो, आंचल मेरे।
एक कौतुक तो उनमें से यह पंछी भी था।
पर कौन शिकारी, आज दोपहर,
क्रूर कर्म कर गुजर गया था।
विद्ध-शर-छाती लिये यह,
मृतक पडा था।
कोलंबसावर त्यांच्या दोन कविता वाचल्या --
किनारा
लो आया किनारा,
गूँजा है नभ में नाविकों का इशारा
आया किनारा।

उन्मत्त तूफानी सागर विकराल
उतारी थी नौका ताने थे पाल
कटी अनसुनी भीरूओं की पुकार

वो संग्राम अब पूण होने चला
युगों की तपस्या की है सिद्धता
वीरों के श्रम का हुआ परिहार।

तट पे हैं झिलमिल पंक्तियाँ दीप की
शलाका लाल पीली या नीलांभ की
तमपे हैं मानों खिले अंगार।

इस का क्षण की थी की हमने आस
इसी के लिये सिद्ध नौका-प्रवास
अब आये हैं वापस जग जीतकर।

जो बिछडे हैं संगी, उनको प्रणाम
उनकी स्मृति रह न जाये अनाम
जयध्वज चढाओं तट पर हमारा
आया किनारा।

.....................................................

3 comments:

Nandan said...

kavita aani tyancha anuvaad aavadla. chatakhana cha arth kay hoto? baki tumacha lekh antarnaad chya diwali ankaat yenar asalyache tyanchya october chya ankat vachale. to vachayachi utsukata aahe.

लीना मेहेंदळे said...

chatkhana = suddenly prasfutit hone.
Other 108 poem (translations are available on my blog
"कुसुमाग्रज कविता ---- "This article was when I had just begun.
I heard Antarnad diwali ank is out. Me too anxious.

मोरपीस said...

अनुवाद चांगला आहे