Thursday, October 3, 2013

एकविसाव्या शतकातील प्रशासन (पुस्तक 4) -- पद्मगंधा दिवाळी 2000

एकविसाव्या शतकातील प्रशासन -- पद्मगंधा दिवाळी 2000 + चित्रप्रत
( किरकोळ दुरुस्त्या हव्या आहेत)

31-03-2000 – 24-04-2000
एकविसाव्या  शतकातील  प्रशासन

      एकविसाव्या शतकात जगासमोर व भारतासमोर कांही महत्वाच्या समस्या असतील आणि विकासाच्या नव्या दिशाही ठरतील.   समस्या सोडवतांना आणि विकासाचे टप्पे गाठतांना जगात जे घडेल त्यांत भारताची भूमिका किती असेल ?  तसेच भारतात जे घडेल त्यांत भारत सरकार किंवा भारतीय शासनाची भूमिका किती असेल? त्यासाठी शासन सुधारणा गरजेची आहे कां?

     शासन म्हटल की त्यांत राजकीय आणि प्रशासनिक असे दोन भाग पडतात. शासन सुधारणेचा विचार करतांना आपल्याला कोणाची (कोणा- कोणाची?) सुधारणा अभिप्रेत असते? आताची प्रशासनिक व्यवस्था एकविसाव्या शतकातील विकासाला गती देऊ शकेल कां? नसेल, तर त्यासाठी कोणत्या सुधारणा कराव्या लागतील? त्या करण्यात कोण समर्थ आहे?  असे कित्येक प्रश्न उभे रहातात.

     या लेखात प्रामुख्याने प्रशासकीय व्यवस्था व त्यामधील सुधारणेचे प्रश्न हाताळले आहेत. त्यांतही खासकरून IAS किंवा भाप्रसे या संस्थेची भूमिका तपासली आहे.

     नोकरशाहीची चौकट हा शब्द सामान्यपणे भाप्रसे मधील अधिका-यांना नजरेसमोर ठेऊन वापरला जाते. याचे कारण आहे की ब्रिटिश राजवटीत या- म्हणजे तत्कालीन ICS- अधिका-यांना अतिशय महत्वाची भूमिका दिलेली होती, व तीच पध्दत आजही चालू आहे. एकीकडे भप्रसे + सेना+ पोलिस + ज्युडिशियरी यांच्यावर एकत्रितपणे कायद्याचे पालन, सुरक्षा, नैसर्गिक आपत्तिंना तोंड देणे व सुव्यवस्था राखणे या जबाबदा-या आहेत. दुसरीकडे भाप्रसे + तंत्रज्ञ व विषय - तज्ञ्ज्ञांकडे मिळून निकासोन्मुख प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे भाप्रसे अधिका-यांना सुव्यवस्था व विकास या दोन्हीं क्षेत्रातील जबाबदा-या दिलेल्या असतात. त्या शिवाय एक मोठी जबाबदारी असते- विविध प्रकारच्या नियंत्रण प्रशासनाची- उदाहरणार्थ, महसूल गोळा करणे, अर्बन प्लानिंग करणे,उद्योगधंद्यांचे नियंत्रण, पाणी- वाटपाचे नियंत्रण,  जमीनीच्या अधिग्रहण किंवा वितरणाचे नियंत्रण, आयात- निर्यातिचे नियंत्रण, निवडणुकांचे नियंत्रण, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे नियंत्रण---- इत्यादि.भाप्रसे अधिका-यांची ही त्रिस्तरीय भूमिका फार कमी लोकांनी विचारात घेतलेली दिसते. पण त्यांचे पडसाद मात्र सर्वत्र उमटलेले असतात, म्हणूनच “नोकरशाही चौकट” या शब्दाचा रोख भाप्रसे अधिका-यांवर असतो. याच कारणासाठी गतिशील प्रशासन, किंवा प्रशासकीय सुधारणेचा विषय निघाला की भाप्रसे अधिका-यांकडे अपेक्षेने पाहिले जाते. ही अपेक्षा पार पाडण्यासाठी हे अधिकारी स्वतः किंवा त्यांचे आपापसातील सहकार्य आणि समन्वय किती योग्य त-हेचे असतात? राजकीय नेते, जनता आणि शासनातील इतर घटक तसेच प्रसार माध्यमे आणि समाजातील विशिष्ट घटक- उदा. उद्योगपति, खेळाडू, शिक्षक, वैज्ञानिक या सर्वांबरोबर भाप्रसे अधिका-यांचे संबंध कशा पध्दतीने तयार होतात व राखले जातात हा ही विचारणीय मुद्दा आहे. या सर्व विवेचनावरूनच सुधारणेची दिशा नक्की करता येऊ शकेल.

      भाप्रसे ची ब्रिटिश राजवटातील चौकट आणि आताची परिस्थिती यामधे दोन महत्वाचे बदल घडलेले आहेत ते लक्षांत ठेवले पाहिजेत. मुळात ब्रिटिश राजवटीतील प्रशासन हे वरिष्ठाभिमुखी होते, म्हणजे प्रत्येक अधिका-याने आपल्या वरिष्ठांकडून आदेश घ्यायचे, आणि ही साखळी या देशाच्या पलीकडे थेट इंग्लंडच्या राणीपर्यंत पोचायची. त्याच क्रमाने ती उतरायची.

     पण लोकशाही चौकटमधे “एक सर्वोच्च बिंदु” असा नसतो, आजची सत्ता - चाकोरी एक वर्तुळ फिरुन पुनः आपल्या जागेवर येते. तलाठी- कलेक्टर- चीफ सेक्रेटरी- कॅबिनेट सेक्रेटरी- प्रधानमंत्री- लोकसभा, लोकसभामतदार संघातील मतदार असे एक भले मोठे वर्तुळ आहे.  थोडक्यांत ज्या लोकांसाठी प्रशासन राबवायचे, ते लोकच सर्वोच्च शासकही आहेत.

    लोकांचे हे शासकत्व लोकसभेइतके लांब वर्तुळ फिरून   परत येते. असे नाही- इतरही लहान मोठी वर्तुळ फिरली जातात. एक वर्तुळ चीफ सेक्रेटरी मुख्यमंत्री विधान सभा - त्यांचे मतदार या मार्गाने परत येते. एक वर्तुळ ग्राम- सेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य- त्यांचा मतदारसंघ असे असते. एक वर्तुळ म्युनिसिपल कर्मचारी - म्युनिसिपल कमिशनर - नगरपालिका सदस्य- त्यांचे मतदारसंघ अशे असते. अगदी गावा पुत पाहिल तरी ग्राम सेवक- सरपंच- ग्रांम पंचायत सदस्य आणि त्यांचे वॉर्डमधील मतदार असे वर्तुळ असतेच.

     पण या चक्रीय गतीत एक अडसर आहे. कलेक्टर- जनता- एक विधान सभा मतदार संघ असा एक छोटा
तुकडा पाहिला तर लक्षांत येते कलेक्टर हा लोकांचा प्रशासक असतो, पण लोकांनी कलेक्टर जवळ शासक म्हणून पोचायचे असल्यास उलट्या दिशेने वर्तुळ पूर्ण फिरून मगच लोकांना शासक म्हणून कलेक्टर पर्यंत पोचता येते. त्यामुळे साधारणपणे लोकांचा व प्रशासकाचा थेट व दुतर्फी सुसंवाद घडून येत नाही. इथे कलेक्टर हा शब्द प्रतिनिधिक अर्थाने आहे व तो सर्वचप्रशासकांना (किंवा नोकरशाहीला) लागू पडतो. या प्रशासकांचा व जनतेचा परस्परांशी प्रशासनिक सत्तेच्या देवाण- घेवाण स्वरूपात संबंध येत नाही. प्रशासन सुधारण्यासाठी स्थानिक पातळीवर जनता सूचना करु शकत नाही. एखाद्या प्रशासकाच्या वैयालिक वागणुकीमुळे अशा सूचना दिल्या जाऊ शकतात, पण पध्दत म्हणून व नित्यनियमाने असे होत नाही. जनता झालेल्या कामाची तपासणी करू शकत नाही. किंवा प्रशासक देखील जनतेला प्रशासनाच्या अथवा सुधारणे मध्ये येणा-या अडचणी सांगून जनतेची थेट मदत घेऊ शकत नाही. त्या एवजी ही देवाण - घेवाण निवडून दिलेल्या जन- प्रतिनिधी मार्फत व प्रसंगी वर्तुळाची लांबची फिरून पूर्ण होते. लोकाभिमुख प्रशासन हा शब्द वापरतांना प्रकाशक व लोकांचे समूह यामध्ये थेट सुसंवाद व त्यातून विचार, सुधारणा आणि सत्ता या त्रिपुटीची देवाण- घेवाण घडून येत नाही.

      जशी ही जनता व स्थानिक प्रशासक या जोडीच्या बाबतील घडत नाही तशीच ती जनता व मुंबईचे शासन किंवा जनता व दल्लीचे शासन या बाबतही घडत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाटियांचे म्युनिसिपल कमिशनर म्हणून रूजू झाल्यानंतर लगेचच झालेल्या बदलीचे प्रकरण . भाटिया यांना म्युनिसिपल कमिशनर नेमल्यानंतर लगेच महिन्याच्या आंत शासनान त्यांची बदली गेली. त्यावेळी जी जनहितयचिका हायकोर्टात दाखल झाली त्यामधे अधिका-यांच्या नैतिक खच्चीकरणाचा मुद्दा मांडला गेला होता.  तो जाग महत्वाचा, तसाच दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की दर महिन्याला, किंवा सहा महिन्याला अधिका-यांची बदली होऊ लागली. तर जे चांगले प्रशासन जनतेला हवे- असते ते कसे मिळणार? पण हा मुद्दा याचिकेत मांडला गेला नव्हता.

     दुसरा बदल गेल्या पन्नास वर्षात घडला आहे- तो म्हणजे “नियंत्रक” या भूमिकेबद्दलची साशंकता. कोणतेही शासन एकाच वेळी विकासोन्मुख व नियंत्रक दोन्ही असू शकते कां? या प्रश्नाचे पंडित नेहरू यांनी दिलेले उत्तर हो असे होते त्यामुळे आपल्याकडे “समाजवादी लोकशाही” ही संकल्पना उद्याला आली. एकीकडे जन- जीवनाच्या कित्येक बाबींवर सरकारी नियंत्रण ठेवतानाच दुसरीकडे जनतेच्या विकासासाठी कित्येक प्रकल्प आणि उद्योग धंदे सेक्टर अंडरटेकिंग म्हणून राबवले गेले. या विकासासाठी निर्माण केलेल्या संस्थामधे देखील भाप्रसे + तंत्रज्ञ + विषयतज्ज्ञ अशी मंडळी एकत्रित कामं करु लागली. नव्या शतकाची पहाट होत असतांना मात्र सरकारी नियंत्रणाची व पब्लिक सेक्टर मधील उपक्रमांचीही गरज नाही- त्या ऐवजी लोकांना त्यांच्या पुढाकाराने कांहीही करू द्यावे- असा खुल्या अर्थनीतीचा सिध्दान्त पुढे येत आहे. त्यामुळेही भाप्रसे अधिका-यांची ही मोठी भूमिका संपणार आहे. खुली अर्थव्यवस्था ही लोकांच्या काम करण्याच्या कसबावर अवलंबून असते व त्या मधे फक्त कौशल्यालाच वाव मिळतो, फोलपट बाहेर सारली जातात अस म्हणतात. पण संक्रमण काळात कांय? जेंव्हा आपण नियंत्रित अर्थव्यवस्थेकडून खुल्या अर्थव्यवस्थेकडे जात असतो (म्हणजे अजून पूर्णपणे पोचलेलो नसतो.) तेंव्हा समाजाची उत्पादकता फक्त कौशल्यावर अवलंबून नसून त्यांत कित्येक इतर बाबी महत्वाच्या ठरतात. विशेषतः जर भारतीय जनते मधे मोठ्या प्रमाणावर कौशल्य क्षमता वाढलेली नसेल, तर जगापुढे आपला निभाव लागू शकत नाही. त्यामुळे कौशल्याची वाढ हा खरा आपल्या समोर परवलीचा शब्द असला पाहिजे. पण आजचे प्रशासन त्यासाठी सक्षम आहे कां? विशेषतः भाप्रसे सारख्या संस्थेची यांत कांयभूमिका आहे?

     आधी मागील पन्नास वर्षांत भाप्रसे संस्थेने कांय केले किंवा केले नाही त पाहू या. देशांभरातून दरवर्षी सुमारे शंभर- सव्वाशे अधिकारी भाप्रसे साठी निवडले जातात. म्हणजेच आतापर्यंत होऊन गेलेल्या भाप्रसे अधिका-यांची संख्या ६००० असून त्यापैकी निवृत्ति अधिकारी वगळता आज रोजी भाप्रसे अधिका-यांची संख्या ५००० एवढीच आहे.

     सामान्यपणे प्रत्येक भाप्रसे अधिकारी सुरूवातीची दोन वर्ष असिस्टंट कलेक्टर या कनिष्ठ पदावर काम केल्यानंतर तिथून लगेचच शासनाच्या सिनियर स्केल व जबाबदा-यांवर नेमला जातो. जिल्ह्यांतील, कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी, म्युनिसिपल कमिश्नर, मंत्राल्यातील डेप्युटी सेक्रेटरी पासून पुढील वरिष्ठ पदे, विभिन्न सार्वजनिक उद्योगांमधे मॅनेजिंग डायरेक्टर, किंवा कांही खात्यांमधील डायरेक्टर, असे अनुभव घेत घेत मंत्रालयात सचिन म्हणून नेमणूक होते. केंद्र सरकारच्याही विविध खात्यांमधे नेमणूक होते. या सर्व काळात या अधिका-यांची विविध खात्यांमधे नेमणूक होते. या सर्व काळात या अधिका-यांची विविध विषयांमधे तज्ज्ञता निर्माण होत जातेच, पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे विभिन्न खात्यांच्या समन्वयाची मोठी जाण निर्माण होते. तसेच ग्रामीण भागावर शासनाच्या योजनांचा व धोरणांचा कांय प्रभाव पडतो, काय पडायला हवा याचीही जाण असते. मात्र भाप्रसे अधिकारी कुठल्याही “खात्याचा” नसतो.

    गेल्या पन्नास वर्षांत भाप्रसे अधिकारी हवेत की नकोत असा मुद्दा लोकांपर्यंत पोचलेला नव्हता, तो आता पोचण्याची गरज निर्माण झाली आहे, कारण देशाची प्रगति कित्येक क्षेत्रात झाली असली तर देशापुढे बरेच मोठे प्रश्नही आ वासून उभे आहेत, व त्यातून आपण बाहेर कसे पडणार याची काळजी लोकांनी करण्याची गरज आहे. हे प्रश्न म्हणजे भ्रष्टाचार, वाढती आर्थिक विषमता, लोकसंख्या वाढ, ब्रेनड्रेन, खाजगी उद्योगधंद्यामधे कमी होत असलेली उत्पादकता तर सार्वजनिक क्षेत्रामधली अनुत्पादकता, ढासळणारी कायदा- सुव्यवस्था, कोर्टापुढे वाढत जाणारे पेंडिंग केसेसचे डोंगर, देशावर वाढत जाणारा भयावह विदेशी कर्जाचा बोजा, आपल्या
नैसर्गिक संपत्ति आणि ज्ञानाचे पुढारलेल्या देशांकडून होणारे पेंटटीकरण, खुल्या बाजारपेठेच्या माध्यमातून होणारे आर्थिक व सांस्कृतिक आक्रमण, फुटीरता, जागोजागची मिलिटन्सी, सामाजिक नीतिमूल्यांचे पतन व स्त्रियांवरील वाढते अत्याचार असे महत्वाचे प्रश्न आज आपल्यापुढे उभे आहेत.

     गेल्या पन्नास वर्षातील भाप्रसे कुठे कमी पडली त्याचा धावता आढावा घेता येईल.
     या देशात राज्य करतांना ब्रिटिशांना राज्य करणे हेच प्रथम उद्दिष्ट होते, इथून मोठा महसूल व संपत्ति गोळा करून नेणे, हा ही उद्देश होता. यासाठी अशी प्रशासनिक माणसे हवी होती जी काम तर ईमाने इतबारे करतील, पण त्यांची नियत सदोदित तपासत राहिले पाहिजे. यासाठी जी ऑडिट व अकौंटिंगची पध्दत शासनात आणली ती आजही तशीच सुरू आहे.

     ब्रिटिशांनी आपल्या देशात प्रशासनाची चौकट घालून दिली, त्यावेळी इथले विषय, इथले वातावरण, इथल्या समस्या त्यांना नव्या होत्या. तरी त्यांनी हे सर्व मुद्दे समजावून घेऊन त्यांचा अनुरूप बळकट अशी चौकट तयार केली. त्यात आता कित्येक सुधारणा करण्याची गरज असूनही, आपलेअधिकारी सुधारणा किंवा नव निर्मितीसाठी सक्षम दिसलेले नाहीत. हाच दोष मोठ्या प्रमाणावर राजकीय नेतृत्वामधेही दिसून येतो. सामान्यपणे कोणत्याही प्रशासनिक चौकटीने सत्तर- ऐंशी टक्के प्रश्न सुटू शकतात. पण हळूहळू न सुटणा-या प्रश्नांची टक्केवारी वाढू लागते. यावर उपाय म्हणजे ती प्रशासकीय चौकट बदलणे! या ऐवजी जो उपाय वापरला गेला तो होता भ्रष्टाचाराचा. इथे दोन उदाहरणे देता येतील- अमेरिकेत एका तलाख बुध्दीच्या मुलने वयाच्या सोळव्या वर्षीच मेडिकल कोर्सेस पूर्ण केले व तो प्रॅक्टीसला पात्र झाला. पण वयाने अजून अझान मायनरच होता त्याला प्रॅक्टीस करू द्यायची की नाही हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अमेरिकत समाजाने व प्रशासनाने वेळ न दवडता दोन निर्णय घेतले- मेरिटचा मान राखलाच पाहिजे- सबब त्याला प्रॅक्टीसची परवानगी असली पाहिजे. हि मिळावी म्हणून प्रचलित कायद्यात सुधारणा केली पाहिजे- कही सुधारणा अवघ्या चार महिन्यांत करून त्या मुलाला डॉक्टरची प्रॅक्टीस सुरू करून दिली. आपल्याकडे कायदा सुधारणेला वर्षानुवर्षे लागतात.

     एक अत्यंत छोटी गोष्ट. इंजिनियरिंग क़ॉलेजची एडमिशन फॉर्म्स घेण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून एका ठराविक दिवशी मोठमोठ्या रांगा लागतात व फक्त फॉर्म विकत घेण्यासाठी लोकांना दहा ते पंधरा तास रांगेत थांबावे लागते- पुण्यासारख्या आधुनिक शहरातही हे थांबवण्यासाठी योग्य ती प्रशासन पध्दत निर्माण करणे कुणाला जमलेले नाही- अशी शेकडो उदाहरणे देता येतील.

    अशी चौकट सुधारणा न झाल्याने जो भ्रष्टाचार बळावला त्याचे तर हजारो किस्से आहेत. महाराष्ट्रात सिमेंटचा तुटवडा निर्माण करून झालेला भ्रष्टाचार कांय सगळ्यांना माहीत आहे. दिल्लीत सरकारी निवास स्थान सरकारी अधिका-यांनाच अलॉट करण्यामधे इतका भ्रष्टाचार वाढला की अधिकारी केंद्रात पोस्टिंग घेईनात. दोन्हीं घटनांमधे संबंधित मंत्र्यांवर भ्रष्टाचारा बाबत खटले भरण्यांत आले. पण प्रश्न असा उरतो की त्या खात्यातील प्रशासनिक अधिकारी कांय करत होते? याचे कारण म्हणजे अशा अधिका-यांविरूध्द बदलीचे तंत्र वापरले जाते, किंवा त्यांचे प्रमोशन, त्यांची वैयत्तिक सुरक्षा धोक्यांत येते. तरीही माझा स्वतःचा अंदाज आहे की यापैकी कांही बाबींमधे अधिका-यांनी स्वतः देखील हात धुवून घेतलेले असतात कारण कांहीही असो- पण सत्तर व ऐंशीच्या दशकामधे शासन पध्दतीत त्वरित सुधारणा करून भ्रष्टाचार थांबवणे भाप्रसे अधिका-यांना जमले नाही हे मात्र खरे. ते इथून पुढेही जमेल की नाही हा एक प्रश्न आहे.

     यामुळे झाले कांय की विकासाची कामे करतांना या ऑडिट पध्दतीचा अडथळा निर्माण होऊ लागला. विकास कामांमधे शंभर टक्के यशाची खात्री देता येत नाही. “रिस्क फॅकटर” असतात. त्यांची दखल घेण्याचे प्रोफेशनल स्किल सरकारी ऑडिट अकौंटिंग सिस्टम मधे नाही.

     एक छोटे उदाहरण घेऊ या एखाद्या खात्याची कार्यक्षमता सुधारावी म्हणून त्या कार्याल्यासाठी जीप खंजूर करण्यांत येते. सर्व सोपस्कार पार पडून जीपची मंजूरी, त्यासाठी पैशाची तरतूर, इत्यादि सर्व बाबी ३० मार्चला त्या कार्याल्याच्या हातात येतात. मग ३१  मार्चला ते सर्व सॅन्कशम लॅप्स होऊन पुढल्या वर्षी पुनः पत्रव्यवहार सुरू होऊन, पुढल्या वर्षी मंजूरी मिळेपर्यंत पुनः मार्च उजाडतो. या आणि अशाच निर्थक कामांमधे सरकारी खात्यांचे महिनेन् महिने आणि मनुष्यळ खर्च पडत असते. आज मुंबई मनपा मधे एडमिनिस्ट्रेशन चा खर्च पंच्याहत्तर टक्कयावर आलेला आहे, आणि विकासाच्या कामासाठी फक्त पंचवीस टक्के उरत आहे. योग्य प्रशासन असेल तर याच्या उलट चित्र दिसल पाहिजे. खाजगी व्यापार- उद्योगामधे तर एडिमिनिस्ट्रेशन वरील खर्च पंधरा ते दहा टक्कयांइतका खाली ठेवला जातो. पंच्याऐंशींच्या सुमारास देशात आर्थिक सुधारणेचे वारे वाहू लागले तेंव्हा मला वाटले होते की चला आता प्रशासनाच्या आर्थिक प्रणाली मधे ही सुधारणा होतील- पण ती फार बाळबोध समजूत होती. असो. हे सर्व मांडण्याचा उद्देश एवढाच की प्रशासकीय कारभारासाठी वापरली जाणारी आर्थिक चौकट सुधारण्याची गरज गेले पन्नास वर्ष दुर्लक्षित राहिलेली आहे. हेही भाप्रसे अधिका-यांचे अपयशच म्हणावे लागेल.

     कित्येक तांत्रिक संस्थांमधे सर्वोच्च अधिकारी भाप्रसे मधून घेतले जातात आणि हा नेहमीच वादाचा विषय असतो. “त्यांना कांय कळते”, किंवा “शिकून शिकून किती शिकतील” असे प्रश्न उपस्थित केले जातात. याबाबत कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी किंवा कडा या संस्थांचे उदाहरण तपासून बघण्यासारखे आहे. जिथे नदीवर मोठा बंधारा बांधला गेल्याने मोठे क्षेत्र कमांडखाली येते तिथे त्या पाण्याचे व पिकांचे नियोजन करण्यासाठी कडा चे ऑफिस उघडले जातात. हे नियोजन नीट चालावे यासाठी बंधारा आणि त्याचे पाट यांची व्यवस्थित निगा राखली पाहिजे- ही तंत्रज्ञानाची एक बाजू. दुसरीकडे शेतक-यांना पाणी भरपूर उपलब्ध असल्यामुळे त्यांनी पीके कोणती घ्यावी, प्रयोग कांय व कसे करावेत हे शिकवणारे कृषि- तजज्ञ, त्या क्षेत्रांत कृषि- प्रक्रियेवर आधारित कित्येक उद्दोग उभारले जाऊ शकतात त्यांचे नियोजन, त्यांच्या साठी लागणारी आयात- निर्यात व्यवस्था, त्या क्षेत्रांत कित्येक कृषि-मजूर बाहेरून येणार, त्यांच्यासाठी सुविधा, त्यांच्या मुलांचे- शिक्षण, अशा शेकडो बाबी देखील निगडीत असतात. मग कडा या संस्थेवर वरिष्ठ अधिकारी नेमतांना तो इंजिनियर असावा की भाप्रसे अधिकारी? समन्वय कायम राखण्यासाठी भाप्रसे अधिकारी हवा असे कुणी म्हटले, तर पाटांची निगा राखण्यासाठी इंजिनियर असे कुणी म्हटले. देशभरांत ब-याच ठिकाणी कडाची ऑफिस उघडली- दोन्हीं त-हेची अधिकारी नेमले गेले- व सर्वत्र यश- अपयशाची कहाणी एकच.

     तोच मुद्दापाटबंधारे आणि बांधकाम खात्याबद्दल देशभरांत या खात्यांचे सेक्रेटरी कुठे भाप्रसे अधिकारी आहेत तर कुठे इंजिनियर्स पण कामातील अकार्यक्षमता, शिथिलता, उदासीनता, भ्रष्टाचार हा सगळीकडे एक सारखाच.

     अस असेल तर सर्वच तांत्रिक खात्यांमधे तांत्रिक अधिकारीच सर्वोच्च पदावर नेमायला कांय हरकत आहे? याची दोन कारणे सांगितली जातात- भाप्रसे अधिका-यांना पहिल्या आठ वर्षात ग्रामीण भाग, तिथले प्रश्न त्यांची हाताळणी या मुळे, तसेच निरनिराळ्या खात्यांतील बदल्यामुळे जीवन निष्ठ अनुभव मोठ्या प्रमाणावर मिळालेले असतात. त्यामुळे त्याला प्रश्नांची आणि पर्यायी उत्तरांची चांगली समज निर्माण होते. नाशिक जिल्ह्यांत कांद्याचे मोठे पीक येऊन पडल्यावर व शेतकरी भाव कोसळण्याच्या भितीने हवालदिल झाले असतांना नाफेडने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करणे, कांदा निर्यातिवरील निर्बंध तत्काळ उठवणे हे गरजेचे असते. हे करता येण्यासाठी अधिका-याला या सर्व सरकारी खात्यांबरोबर तत्काळ समन्वय साधता आला पाहिजे. असे मानले जाते की सर्व देशभरासाठी भाप्रसे ही एक सेवा निर्माण केलेली आहे म्हणूनच त्यांना असले समन्वय जमू शकते. नाशिक जिल्ह्यधिकारी जेंव्हा दिल्लीच्या निर्यात कमिशनरला तत्काळ परवानगीची मागणी करतो तेंव्हा, तिथला अधिकारीही या किंवा अशाच अनुभवांनी समृध्द असतो आणि त्याला परिस्थितीचे गांभीर्य पटकन कळून तो त्यावर लगेच कारवाई करतो. हा सिध्दान्त झाला. पण खरोखर याप्रमाणे काम होतांना आजच्या काळात दिसते कां? किती प्रमाणात?  यात अपयशाचे प्रमाण किती असते?

     समन्वयाची दुसरी बाजू पण आहे. गेल्या दहा- वीस वर्षांत असे प्रसंग घडलेले आहेत ज्यावेळी एखाद्या खात्यामधे पगार वाढीसाठी त्या खात्यापुरते आंदोलन झाले आहे. अशा वेळी वरिष्ठ अधिकारी जर त्याच खात्यातील तांत्रिक अधिकारी असेल, तर अशा पगार वाढीमधे त्याचे स्वतःचे हितसंबंध गुंतलेले असतात, त्याऐवजी भाप्रसे खात्याचा असेल तर तो अलितपणे आणि यथार्थवादी निर्णय घेऊ शकतो. अशा प्रकारच्या पगारवाढीचा इतर खात्यांवर आणि पर्यायाने सरकारी निजोरीवर किती बोजा पडेल याचा विचार करू शकतो. सर्व त-हेच्या खात्यांच्या कामाची, त्यांच्या जबाबदा-यांची व महत्वाची जाणीव असते, त्यामुळे त्याचे निर्णय जास्त सर्वंकष असू शकतात.

     या सर्व चर्चेनंतर आपण मुख्य मुद्याकडे वळू शकतो- तो म्हणजे प्रशासनिक चौकटीत कांय सुधारणा व्हावी व ती कुणी करावी? राजकीय पुढा-यांना अशी सुधारणा करणे जमू शकेल कां? किंवा प्रशासनिक अधिका-यांना जमू शकेल कां? एखाद्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी मधे प्रशासकीय सुधारणा अशा नांवाचा विभाग उघडावा कां? देशातील सर्व भाप्रसे अधिकारी जिथे सर्वप्रथम जाऊन रूजू- होतात त्या मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री प्रशासकीय एकॅडिमीचा या बाबतीत रोल कांय असेल? जनता या विषयावर चर्चा करील कां? विभिन्न व्याख्यानमाला आपल्याला जागोजागी दिसतात.

असे प्रश्न आणि अशी चर्चा त्यांच्या व्यासपीठावर मांडता येईल कांय?

     प्रशासनिक सुधारणेची गरज आहे कां? या प्रश्नाचे उत्तर बहुतेक जण हो असेच देतील, पण नाही असेही उत्तर कोणी देईन कां? एकत्रित पणे कोणत्याही कार्यालयातील वरिष्ठ अधिका-याला विचारा- त्याचे ठरलेले उत्तर असेल- त्याच ठरलेले उत्तर असेल- त्याच खात, त्याच ऑफिस, त्याचा कारभार हा The best of all आहे. सुधारणेची गरज इतरांना आहे!


    या मताशी जनता सहमत आहे कां? नसेल तर जनतेने कांय करावे?
-------------------------------------------------------------------------------------





















Tuesday, October 1, 2013

ही मासिके लेख ठेऊन काढून टाकली

 लेख ठेऊन घेतले व ही ( व अन्य बरीच) मासिके काढून टाकली -- ऑक्टोबर 2013 -- मुंबई (लेख होपफुली सेफ)
--- Mainstream June 16, 2001
--- Mainstream December 8, 2001
--- Mainstream January 26, 2002


तेचन् तेच (बायकाच त्या) अनुवाद -- मिळून साऱ्याजणी मे 2000
इंडिया गेट अनुवाद -- अंतर्नाद मार्च 1998
बदला अनुवाद -- अंतर्नाद ऑगस्ट 2000
एकविसाव्या शतकातील प्रशासन-- पद्मगंधा दिवाळी 2000
स्र्त्री-भ्रूण हत्या - स्त्री पुरुष असमतोल --- अंतर्नाद दिवाळी 2001
ती एक राणी -- -- मिळून साऱ्याजणी जुलै 1999
बायोडीझेल काळाची गरज -- लोकराज्य जुलै 2006
बायोडीझेल -- अपार संभावनाएँ -- IASRD seminar report No 1
Propogation of Bio-diesel --Route chalked by PCRA -- IASRD seminar report No 3
शेखचिल्लीकी गाय --देवपुत्र अप्रैल 2001
असे होतात सिंचन घोटाळे -- सा. विवेक 7 एप्रिल 2013
पुष्कळांना हवा असे दुष्काळ --सा. विवेक 21 एप्रिल 2013
रुपया घसरला -- त्याबाबत  -- सा. विवेक 18 ऑगस्ट 2013
जाणावे मनाचे व्यापार -- मुक्ता अम्यूजमेंट -- दिवाळी 2008
यशोगाथा अस्मितेची (मुलाखत) -- मुक्ता अम्यूजमेंट -- मार्च 2009
मुलाखत -- महिला दिन विशेषांक सांज सह्याद्री टाइम्स, 2007
तीन उत्साही पावले -- शब्ददर्वळ दिवाळी 2006
समाजकारण रोडावल, भ्रष्ट राजकारण फोफावल -- शब्ददर्वळ दिवाळी 2008
अच्युतराव -- मैत्रीच्या पलीकडे खास अंक मार्च 2000
अमानत --- प्रारंभ  अगस्त 2001
आँखें नाटक अनुवाद -- अक्षरपर्व दिसंबर 2005
मना अजाणा -- --- अंतर्नाद मे 2007
एक शहर मेले त्याची गोष्ट -- अंतर्नाद दिवाळी 2007
बेआवाज धमाका अनुवाद -- अक्षरपर्व दिसम्बर 2000
चिंतामण मोरया -- कलाजागृती दिवाळी 2007
युगांतर घडतांना --सा. लोकप्रभा 18 मे 2007
संगणकपर हिंदी लानेसंबंधमें  -- नागरी संगम एप्रिल-जून 2007
मित्राला मदत हवी -- देवपुत्र मराठी जून 2013
खिचडी-खिचडी -- देवपुत्र दिसंबर 2006
माझे पहिले दशक --- व्यासपीठ दिवाळी 2009
डरपोक --सृजन संदर्भ -- ऑक्टो.-डिसें 2008
हॉलैंडका समाज दर्शन ---- सृजन संदर्भ -- ऑक्टो.-डिसें 2009
महिलाओंपर अत्याचार, चिन्ता का विषय -- हिमप्रस्थ अगस्त 2001
कुसुमाग्रज की कविताएँ -लेख -- हिमप्रस्थ अक्तूबर 2001
लीना मेहेंदले की कविताएँ -- हिमप्रस्थ दिसंबर 2007
भेकड -- अंतर्नाद -- जाने. 2010
शीतला माता -- हम लोग -हिंदी पुणे विशेषांक 2012
राजस्थान में बच्चियोंको  जनमने और पढनेका हक -- योजना फरवरी 2002
विदा, ग्रहण, हिसाब --- इंद्रप्रस्थ भारती जन.-मार्च 2003
गो.नी.दांडेकर -- समकालीन भारतीय साहित्य (साहित्य अकादमी की पत्रिका)  सित.-अक्तू 2000
कुसुमाग्रज कविता हम दोनों, सैनिक अनुवाद-- समकालीन भारतीय साहित्य (साहित्य अकादमी की पत्रिका)  मार्च-अप्रैल 2003
कठिन नही है डगर अभिभावक की -- हिमालयन Oasis जुलै 2007
Crime against Women --Yojana Feb 2002
A Historical Irrigation Scheme --Yojana Oct 1999
-----------------------------------------------------------------------------------------------------------
कोणते लेख
-------------  अंतर्नाद -- एप्रि. 1999
-------------  अंतर्नाद मे 2007
-------------- अंतर्नाद जाने. 2008
------------- हिमालयन ओऍसिस
-------------------------------------------------------------------------------------------------------------

कोणते लेख
लोकमत पुणे ऊर्जा सदर  21 फे 2009
गोसावी गौरव विशेषांक नाशिक 28 सप्टें 2008
जळगांव सकाळ विशेषांक 29 फे. 2008 मन54
लोकमत पुणे ऊर्जा सदर   3 जा 2009
मुंबई सकाळ सप्तरंग  4 ऑक्टो. 2009
लोकसत्ता मुंबई  5 डि 2008
लोकमत  मुंबई  22 जून 2009
लोकमत  नाशिक  14 फे. 2009








Saturday, August 10, 2013

कोण पेलेल हे आव्हान? --साप्ताहिक विवेक २००३ दिवाळी अंक

कोण पेलेल हे आव्हान?

--साप्ताहिक विवेक २००३ दिवाळी अंक

लीना मेहेंदळे (आय. . एस.)

देशाच्या स्वातंत्र्याला पंचावन्न वर्षे झाली. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता ती पिढी जवळजवळ संपत आली.

या काळात देशाने ब-याच क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. विशेषतः अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता, त्याचबरोबर देशभर विणलं गेलेलं रस्त्यांचं जाळं, औद्योगिक क्षेत्रातील वाढ, विज्ञान- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील वाढ इत्यादींकडे बोट दाखवत येईल. अणुऊर्जा, अंतरिक्ष कार्यक्रम, संगणक यासारख्या क्षेत्रातही भरघोस प्रगती झाली असे आपण म्हणू शकतो. निदान इतर विकसनशील देशांच्या तुलनेत आपली प्रगती चांगली आहे. असं असूनही आपण आज विकसित देशांच्या यादीत नाही. याचाच अर्थ असा की विकास आणि प्रगतीच्या दौडीत आपण कुठेतरी मागे पडतो आहोत.

येथून पुढच्या पंचवीस वर्षांच्या काळात आपण मोठी झेप घेणार का? निदान आता आहोत त्यापेक्षा खाली तर घसरणार नाही ना? अशीही काळजी ब-याच जणांना वाटते. जशी आपल्या प्रगतीची काही क्षेत्रं मोजता आली तशीच आपल्या घसरणीचीही काही क्षेत्रं मोजता येण्यासारखी आहेत. म्हणूनच त्यांची चर्चा करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्यानंतर सुरवातीच्या काळात विशेषतः पंचवार्षिक योजनांच्या माध्यामातून आपण दोन मुख्य धोरणे ठेवली. पाहिली म्हणजे कृषीक्षेत्रातील विकास साधता- साधता जोडीला औद्योगिक विकास साधावा हे धोरण आणि औद्योदिक विकासासाठी लागणा-या मूलभूत वस्तूंचे उत्पादन व वितरण दोन्हींना अधिक गती मिळावी, त्यांना सरकारी क्षेत्रातच राखून ठेवणे.- उदाहरणार्थ कोळसा, लोखंड, वीजनिर्मिती, रेल्वे व टपाल खाते! यासाठी आपण संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. उद्देश हा की अमेरिकन पद्धतीची खुली अर्थव्यवस्था व रशियन पद्धतीची कंट्रोल्ड अर्थव्यवस्था या दोंन्हीतले फायदे देशाला मिळावेत, त्याचबरोबर देशांतील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळावे अशा प्रकारची आपली आयात-निर्यात नीती सुद्धा होती. हे जणू आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातले आरक्षणच होते. यांच्याच जोडीला सामाजिक आरक्षणही दिले गेले ते तर थेट संविधानातूनच आले होते.

आपला देश कृषिप्रधान आहे, तसेच इथे आत्यंतिक गरिबी, दुष्काळ, भूकबळीदेखील आहेत हे लक्षात घेऊन शासनाने कृषिविकास, आरोग्य आणि शिक्षण यांची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्यासाठी कानाकोप-यांत शाळा, दवाखाने इत्यादी उघडण्याचे धोरणही ठेवले होते.

हे सर्व राबवणार कोण होते? तर लोकशाही पद्धतीने निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि ब्रिटिश काळापासून स्टीलफ्रेम म्हणून वाखाणली गेलेली नोकरशाही. या जोडीला कारखानदार, पत्रकार, विव्दज्जन आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिकाही मान्य करण्यात आली होती आणि विकास घडवण्यात त्यांनी मोठा वाटा उचलावा अशी अपेक्षा होती.

पुढील काळातील आव्हाने कशी पेलणार आहोत, याचा विचार करताना ही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. देशापुढे कोणकोणती आव्हाने आहेत याचा विचार करताना मला प्रकर्षाने असे वाटते की शासनकर्ते हेच देशापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ श्रेणीतील नोकरशहा हे दोघेही येतात. यांच्यापैकी अनेकांमध्ये आज आर्थिक भ्रष्टाचार, निराशावाद (काहीचं चांगलं होणार नाही,) उदासीनता, (मी माझं काम व्यवस्थित करतेय\ करतोय ना? बस्स!) स्वधन्यता (माझं काम मी सर्वोत्कृष्ट करतोय आणि देशांत सगळं काही आलबेल आहे!) अदूरदृष्टी हे दुर्गुण आहेत. याशिवाय सांघिक इच्छाशक्ति आणि संघ भावनेचा अभाव हे त्यातून मोठे दुर्गुण. संगच्छध्वम्... सं वो मनासि जानताम्.. वगैरे सगळं फक्त बोलायला ठीक! याची दोन उदाहरणं सांगता येतील- गुजरात भूकंपाच्या वेळी शासनातील सगळे विभाग एकत्रित येऊन आणि देशालाही विश्वासात घेऊन पुनर्वसनाचे काम करत आहेत असं चित्र कुणाला दिसले? किंवा गुजरात दंगलीनंतर तरी कुणाला दिसलं? त्या आधी ओरिसामधील वादळात कुणाला दिसले?

दुसरं उदाहरण घेऊ या. देशासमोर संपूर्ण देशाच्या म्हणता येतील अशा दहा सर्वात जटिल समस्या कोणत्या आहेत आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी काय करता येईल याबद्दल कुठलीही यंत्रणा सातत्याने दर महिन्याला विचारविनिमय करते का? आणि ज्या जनतेकडे सार्वभौम सत्ता आहे असं म्हणतात त्या जनतेला त्याबद्दल विश्वासात घेतले जाते का?

पंतप्रधान सर्व मंत्र्यांबरोबर किंवा कॅबिनेट सेक्रेटरीबरोबर अशा प्रश्नांबाबत सातत्याने, ठरावीक मुदतीत चर्चा करतात का? कुठल्याही खात्याचे मंत्री त्यांच्या खात्याच्या परफॉर्मन्सबद्लल खात्यातील सर्व सहसचिव व त्यावरील अधिका-याबरोबर सात्याने ठरावीक मुदतीत चर्चा करून त्यांची मते ऐकून घेतात का? त्यांच्यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग नामक काही घडते का?

मी महाराष्ट्रात सेटलमेंट कमिशनर असताना दर महिन्याला सर्व विभागीय अधिका-याबरोबर बैठक घेत असे. त्यामधे मी अशी पद्धत सुरू केली की वेगवेगळ्या विभागातील दोन दोन कनिष्ठ अधिकारी प्रत्येक विभागीय मिटिंगला बोलवायचे आणि आम्ही ठरवत असलेल्या योजना प्रत्यक्ष गावपातळीवर उतरवत असताना त्यांना काय अडचणी येतात त्या त्यांच्या तोंडूनच ऐकायच्या. यामुळे आम्हाला खात्याच्या कामात कित्येक सुधारणा करता आल्या.

शासनाकडूनच तीन प्रकारचे अपव्यय आज देशांत मोठ्या प्रमाणात होत आहेत. पैशांचा अपव्यय, चांगल्या कर्तबगार अधिकाऱ्यांच्या कार्यशक्तीचा अपव्यय आणि कधीकाळी प्रयत्नपूर्वक उभारणी केलेल्या चांगल्या संस्था, चांगल्या प्रथांची ढासळणी आणि अपव्यय!

एक गोष्ट सांगतात की अकबर बादशाहाने तीन प्रश्न विचारले होते -- रोटी क्यों जली, घोडा क्यों अडा, पानी क्यों सडा, आणि या सर्वावर बिरबलाचं एकच उत्तर होतं फेरा न था। तसेच शासनातही मेटेंनंस नसल्यामुळे कित्येक चांगल्या संस्था, चांगली ऑफिसेस, चांगल्या इमारती ढेपाळत आहेत. त्या कशासाठी निर्माण केल्या होत्या? आजही त्या आपापल्या उद्देशांची पूर्ती करतात का? त्यांच्या उद्दिष्ट काही बद्ल करण्याची गरज आहे का? राषट्रासमोर जे एकत्रित उद्दिष्ट आहे त्याला या संस्थांची उद्दिष्टं पूरक आणि समर्पक आहेत का? नसल्यास काय करावे? या बाबींचा विचार शासनात केला जात नाही.

देशासमोरील दुसरं मोठं आव्हान म्हणजे मोठ्या प्रमाणात मोठ्या व्यक्तींनी चालवलेली आर्थिक लूट. अगदी मुदंडा केसपासून सुरवात करून तर हर्षद मेहता व फेयर ग्रोथ स्कॅम, यूटीआय स्कॅम, तमाम बँकांमधे होत असलेली स्कॅम, दहा वर्षापूर्वी कॅनरा बॅंक, बँक ऑफ इंडिया इ. मध्ये झालेली स्कॅम्स, त्यामध्ये घोटाळे करणा-या उद्योपतींना संरक्षण, हवाला पैशाचा ओघ, तहलका प्रकरणात बाहेर आलेले मुद्दे... यापैकी कुठल्याच प्रकरणात दोषी व्यक्तींना सश्रम कारावासाची शिक्षा आणि त्यांच्या स्थावर जंगम मालमत्तेतून समाजाच्या, लोकांच्या पैशाची वसूली झालेली दिसून येत नाही. उलट त्यांना या ना त्या मार्गाने पाठीशी घालण्याचे प्रकार दिसून येतात.

आजही थोरामोठ्यांकडे इन्कम टॅक्सच्या रूपाने थकलेली बाकी पहा. मोठ्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे घेऊन बुडवली त्यांची यादी पहा, बँकांच्या नॉन परफॉर्मिंग असेट्सची यादी पहा. खुल्या बाजारात 36 ते 60 टक्के व्याजदाराने पैसा उभारावा लागत असूनही बँकांना मात्र चौदा ते अठरा टक्के दराने कर्ज घेणारे गिऱ्हाईक सापडत नाही यावरून लोकांना त्यांच्या अकार्यक्षमतेचा अंदाज येतो. रिझर्व्ह बँकेला आणि सरकारला मात्र येत नाही. आणि यांना म्हणतात आर्थिक तज्ज्ञ.

हॉँगकॉंगमध्ये पूर्वी दहा नावे प्रसिद्ध केली जायची.‘’आम्हाला यांचा अभिमान आहे. यांनी सर्वात जास्त टॅक्स भरला’’. असं सांगणारी! आपल्याडे काही उद्योगपती आपण किती नफा करून डिविडंड दिला आणि तरीही टॅक्स भरावा लागणार नाही याची काळजी घेतली याच्या पानभर जाहिराती देतात. त्यांचे मार्ग योग्य होते की अयोग्य याची कधी चौकशी झाल्याचे ऐकले नाही. पण ते मार्ग इतरांना कधी जाहीरही केले जात नाहीत.

मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तींच्या घरावर धाडी पडतात, त्यांच्या दिव्य, झगझगीत संपत्तीचे प्रदर्शन लोकांना होते. त्यांच्या तिजोरीत सापडलेल्या रूपयांच्या थप्प्या मोजणारे हात थकून जाऊन बेशुध्दही पडतात, त्यांच्या गाद्या, उशा उसवून दागदागिने आणि नोटांच्या चळती बाहेर काढल्या जातात, अशा लोकांचे आणि त्यांच्या पैशांचे काय होते? अंतुले यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या केसची सुनावणी हे व ते बारीकसारीक मुद्दे उपस्थित करून चौदा वर्ष झुंजत ठेवली. मग अखेर जेव्हा सुनावणी सुरू झाली, तोपर्यंत सर्व पुरावे विस्कळीत होऊन हरवून गेले होते. एक अत्यंत उत्तम वस्तुपाठ अंतुलेंनी घालून दिला आणि कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्ठाचाराच्या आरोपातून हमखास सुटकेचा रस्ता सर्वांना दाखवून दिला. आपल्या देशात गैरमार्गाने उत्पन्न मिळविणा-या व्यक्तींना शिक्षा होऊ शकते हे सिद्ध करण्यची जबाबदारी सरकार आणि न्यायालयांवर आहे. पेलणार का त्यांना हे आव्हान?

आता तर एका पाठोपाठ एक पब्लिक सर्व्हिस कमिशन्समधील भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर निघत आहेत. पंजाब, महाराष्ट्र, बिहार, आसाम ! त्या आधी देखील नोकरी किंवा इतर खुर्च्यांवर चिकटण्यासाठी पैसे मोजावे लागत न्व्हते का? लाख- दोन लाख रूपये भरून नोकरी मिळवणारा कॉन्स्टेबल किंवा पोलीस सब-इनस्पेक्टर, शाळा, कॉलेज मध्ये लागणारे शिक्षक, चांगल्या चौकीवर बदली मागून घेणारे अधिकारी, अंदाधुंद पैसे खर्च करून निवडून येणारे लहानापासून ते मोठ्यापर्यंत लोकप्रतिनिधी आणि आता लोकसेवा आयोगांमधे पैसे चारून वरिष्ठ अधिकारपद मिळवणारे ऑफिसर हे सर्व खूर्ची मिळाल्यानंतर सचोटीने वागतील की आधी आपला झालेला खर्च वसूल करतील?

देशासमोर तिसरे आव्हान आहे उत्पादनघटीचे. गेल्या पंधरा वर्षांपासून ब्लायंट एकॉनॉमीला सलाम करीत, उत्सवसदृश वातावरणात मशगुल रहात सरकारी अधिकारी व मंत्र्यांनी आर्थिक संपन्नतेचे बरेच गोडवे गायिले आणि प्रत्येक वेळी त्यांची परिणती. स्कॅममध्ये झाली. कारण आर्थिक संपन्नता खरोखर येणार असेल तर खरी उत्पादनवाढ व्हायला हवी. ती कुठे दिसते? कच्च्या मालातून मोठ्या प्रमाणावर पक्का माल निर्माण व्हायला हवा तो कुठे दिसतो? फक्त कृषिक्षेत्रातच अन्नधान्याचे उत्पादन वाढले हे कबूल करावे लागेल. देशात ज्या त्या कच्च्या मालाचे उत्पादन किती वाढले ते तपासा अगर त्यांच्यावर प्रक्रिया करून पक्क्या मालाचे किती उत्पादन वाढले ते तपासा! वाढीव उत्पादन किती सुलभतेने व कमीत कमी दराने लोकांपर्यंत पोहोचले ते तपासा. एकीकडे धान्याची भरलेली भांडारे सडून जाताना आणि कुपोषण व भूकबळीने मृत्यु दुसरीकडे असे कितीदा घडले ते तपासा. ते लोकांना खुले करून सांगा आणि मग ब्लायंट एकॉनॉमीचे गोडवे गा. कोण पेलेल हे आव्हान?

देशासमोर चौथे मोठे आव्हान आहे ते बेरोजगारांचे तांडेच्या तांडे निर्माण होत आहेत त्यांचे. त्यातून वाढणारी गुन्हेगारी, संगठित गुन्हेगारी, जातीय दंगली, स्त्रियांवरील वाढते अत्याचार, मुलांचे शोषण, वनवासी, दलितांचे शोषण या सर्वांची एक साखळी तयार होत आहे. आणि आपण त्याला तोंड देण्याला अपूरे पडत आहोत. याचे खापर फोडायला दोन चांगली कारणं आपल्याकडे आहेत. जागतिक मंदी आणि आपली वाढती लोकसंख्या! पण त्यांचा जप करून आपले आव्हान पेलता येईल का?

माझ्या मते सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे शिक्षण या बाबीकडे झालेले व होणारे दुर्लक्ष! आजचे आपले शिक्षण रोजीरोटी मिळवून देऊ शकत नाही. ते मातृभाषेत नसल्याने गळतीचे प्रमाण प्रचंड आहे व त्याला सोपा उपाय म्हणजे शासन पातळीवरून इंग्रजीचा हव्यास कमी करणे हाच आहे. आजच्या शिक्षणाापासून व्यवसाय किंवा कौशल्याचे शिक्षण मिळत नाही. ते सर्वांना सुलभतेने कमी खर्चात मिळत नाही. ते आनंददायी नाही! याची जोपर्यंत आपण आज काळजी घेत नाही. तोपर्यंत नुसते देशाच्या भूतकालीन गौरवाचे गोडवे गाऊन काहीही साध्य होणार नाही.

जनसंख्या वाढत आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार आहे. इकडे आपले तर शिक्षणावरील बजेट कमी कमी होत चालले आहे. ज्या शिक्षणातून माणूस घडायचा आणि मग त्या माणसाने देशाचा विकास करायचा ते शिक्षणच आपण महागडे आणि अनुपलब्ध करत आहोत किंवा ते संदर्भहीन तरी होत आहे. त्यातून जी कुणी शिकली सवरली हुषार मुले निघतात ती हा देश राहाण्याच्या लायकीचा नाही म्हणत पळ काढतात. जे इथे उरतात त्यांनी स्वतः सब्सिडाइज्ड शिक्षण घेतलेले असले तरी इतरांनी पैसा टाकूनच शिक्षण घ्यावे अशी भलामण करताना दिसतात.

देशाचा विकास व्हायचा असेल तर संपूर्ण शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करायला हवा. नवीन धोरणाचे अनुकूल व झपाट्याने दिसतील असे उद्दिष्ट ठरवायला हवे. मात्र आज शिक्षण हा विषयच देशाच्या प्राथमिकतेत नाही. प्राथमिकता आहे ती निर्गुंतवणुकीची आणि नोकरकपातीची. तीही सर्वात जास्त शिक्षण क्षेत्रात !

विषयानंतर होईल तरीही या मुद्याबाबत काही सुचवावेसे वाटते. दूरदर्शनचा योग्य तो वापर करून अत्यंत रंजकतेने व्यवसाय शिक्षणाचा मोठा पाया घातला जाऊ शकतो. वरच्या वर्गातल्या मुलांना खालच्या वर्गात शिकवण्याचे काम दिले जाऊ शकते. परीक्षा पद्धतीत सुधारणा करून आज त्या कामात अडकलेले मोठे मनुष्यबळ बाहेर काढता येऊन इतरत्र वापरले जाऊ शकते. संगणक आणि जैव- तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रियांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती केली जाऊ शकते. आताचे अभ्यासक्रम बदलून ते जास्त व्यवसायाभिमूख केले जाऊ शकतात. त्यातून अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीचा वापर वाढवता येऊ शकतो. एखाद्या जिल्ह्यात तरी असे प्रयोग सुरू करायला काय हरकत आहे?

देशापुढील दुसरे मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद- जो काश्मीर आणि उत्तर पूर्व क्षेत्रांत फार उग्र रूपाने वाढत आहे. यावर दीर्घकालीन उपाययोजना करावी लागणार.

संस्कृत, हिंदीसह सर्व भारतीय भाषांचे खच्चीकरण आणि मुख्य म्हणजे त्या ज्ञानसाधनेच्या भाषा नसणे, विज्ञान आणि समाजविज्ञानाची पुस्तके भारतीय भाषांमध्ये निर्माण न होणे, न्यायालय व प्रशासनातही ती भाषा न वापरता येणे हे देशाच्या अस्मितेवरच एक मोठे संकट आहे. ते कधी कोण लक्षात घेणार?

अजूनही किती तरी महत्वाची काळजी करण्यासारखी आव्हाने सांगता येतील. हुषार विद्यार्थ्याचे ब्रेनड्रेन, जातीयतणाव, आरक्षणातून निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये क्रिमीलेयर बाहेर काढण्यासाठी योग्य ती यंत्रणा निर्माण न करू शकणे, वाढते प्रदूषण, वाढती आर्थिक विषमता, काम पुरवू न शकल्यामुळे जी ओझ्यासारखी झाली आहे ती वाढती लोकसंख्या, त्यामध्ये जन्मजात किंवा अजन्मजात मुलींना मारून टाकण्याचे वाढते प्रमाण, अशा कितीतरी काळजीत टाकणाऱ्या, राष्ट्रीय पातळीवर महत्व द्यावा अशा बाबी आहेत.

पण या घडीला मला मोठे आव्हान वाटत आहे ते एका वेगळ्याच मुद्याचे. या वर्षी बजेटमध्ये आपण वाचले आमदनी अठन्नी खर्चा रूपय्या, नतीजा ठन् ठन् गोपाल! गेली बरेच वर्षे आपण यांची तोंडमिळवणी करण्यासाठी कर्ज काढत राहिलो. त्यावेळी जे सत्ताधारी होते त्यांना कुणी विचारले नाही बाबांनो देशाला कर्जाच्या खाईत लोटता आहात ते फेडणार आहे कोण, आणि कसे? विचारले असते तरी त्यांचे उत्तर सोपे होते. आम्ही आहोत तोपर्यंत ऋणं कृत्वां घृतं पिणार, आणि विकासाच्या नावाखाली घेतलेल्या कर्जाचा बराचसा भाग आमच्या खिशात घालणार. फेडण्याची वेळ येईल, तेव्हा आम्ही नसू. काय त्रास होईल तो तुमचा. अशा तऱ्हेने व्याजाचा बोजा वाढत गेला. आता अजून कर्ज काढण्यासारखी परिस्थिती (खरं म्हणजे साख) उरली नाही. अशा वेळी शेतकरी किंवा सामान्य माणूस काय करतो? घरातले दागदागिने, भांडीकूंडी, जमीन- जुमला विकायला काढतो. सध्याचे निर्गुंतवणुकीकरण त्या प्रकारातले तर नाही ना? मग ज्या वेळी विकण्यासारखे इतर काही उरणार नाही तेव्हा आपण कुणाकुणाला बोलीवर लावणार?

ही भीती खोटी असो हीच सदिच्छा! पण ते लोकांना सिद्ध करून देण्याचे आव्हान कोण पेलणार?

मला एक गोष्ट आठवते. एका देशाचा राजा अचानक वारला. त्याला वारस नव्हता. राजा कुणाला करावे? असे ठरले की, दुसऱ्या दिवशी गावच्या वेशीवर एक हत्ती सोंडेत माळ घेऊन उभा राहील. येण्याजाणाऱ्यापैकी ज्याच्या गळ्यात माळ पडेल त्याला राजा केले जाईल. हत्ती सकाळी वेशीवर आला तो तिकडून एक संन्यासी जात होता. हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्याला राजा केले.

एक दिवस शत्रू राज्यावर चाल करून आला. शत्रूसैन्य वेशीवर येऊन ठेपले. राजदरबारात वर्दी आली. राजा म्हणाला, ठीक आहे येऊ द्या!

थोड्या वेळाने वर्दी आली. शत्रूसैन्य दरबाराच्या दारावर आले आहे. राजा म्हणाला ठीक आहे, येऊ द्या. मग शत्रूसैन्य अगदी राजाच्या आसनापर्यंत आले. राजा म्हणाला ठीक आहे. आता ती माझी संन्याशाची वस्त्रं मला परत द्या. ती घालून मी जातो माझ्या मार्गाला. तुमचं तुम्ही पाहून घ्यां.

गेली सुमारे पंधरा- वीस वर्ष आपलं शासन, ज्याचा आपण भाग आहोत, ते असंच वागत आलेलं नाही का?

आज सर्वत्र ई गव्हर्नन्सचा बोलबाला आहे. पण ई गव्हर्नन्स ही फक्त पहिली पायरी असते, साधन असतं. खरं तर आपल्याला हवं असतं, जी गव्हर्नन्स अर्थात गुड गव्हर्ननन्स. पण संगणकाचा वापर करून आपापल्या खात्याच्या कामगिरीचे झटपट मूल्यमापन करणे आणि त्याला अनुसरून आपल्या कामाची पद्धत सुधारण्याची कला आज किती जणांना अवगत आहे? कुठे देतात हे शिक्षण?

चांगले शासन निर्माण होण्यासाठी हाती असलेल्या मनुष्यबळाकडे लक्ष पुरवले पाहिजे. चांगला समाज निर्माण होण्यासाठीही देशातील मनुष्यबळाचे कौशल्य आणि उत्पादनक्षमता वाढवली पाहिजे. हे भान असेल आणि त्याबरहुकूम कामे झाली तर देशाची प्रगती लांब नाही.

-----------------------------ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं--------------------

01-08-2013  नंतर लिहिलेल्या लेखांची यादी

प्रशासन आणि राजकारण -- बाहूले न बनणे आपल्याच हाती -- को. सकाळ व ई-सकाळ 01-08-2193

किती दुर्गा किती माफिया -- मटा -- 11-08-2013

रुपयाची घसरण आणि सामान्य माणूस -- साप्ता. विवेक 15-08-2013
---------------------------------------------------------------------------
पुष्कळांना हवा असे दुष्काळ - - माझा लेख साप्ताहिक विवेक मधे (२१-०४-२०१३)
http://magazine.evivek.com/?p=2178

Rishi-Krishi Sanskriti : A 3-tier Eco-friendly life-style with sustained

 societal progress


नागरिकांच्या कर्तव्यबुध्दीत सातत्य असणे गरजेचे!

evivek | January 22, 2013 | 0