Sunday, November 8, 2009

परस्परसवांद आणि सामंजस्य महत्वाचे

परस्परसवांद आणि सामंजस्य महत्वाचे
वर्तमान दिवाळी अंक 1986
आमच्या घरात सुरूवातीपासून शिक्षणाला अतिशय पोषक वातावरण होतं माझे वडिल संस्कृतचे प्रोफेसर त्यामुळं आपल्या मुलांनी खूप शिकावं असं साहजिक त्यांना वाटे. आई-वडिल दोघेही पुरोगामी विचाराचे होते. मुलगा-मुलगी भेद त्यांनी कधीच केला नाही. मी सगळया भावडांत मोठी. माझ्यानतंर एक बहीण आणि सगळयात धाकटा भाऊ. माझ्या वडिलांना फिरायची खूप हौस. मी मोठी असल्यानं त्यांच्या पटकन हाताशी आले. त्यामुहे मला त्यांच्याबरोबर खूप हिंडायला मिळालं. मुलीनं एवढं हिंडून करायचंच काय वगैरे वृत्ती त्यांच्याजवळ नव्हती. त्यावळेस आम्ही बिहारमध्ये दरभंगा इथे रहायचो. मुळात बिहार हे तसं मागासलेलं राज्य त्यातून आम्ही राहत असलेलं ठिकाणही शहराचं नव्हतं. पण त्यांनी मला सायकल शिकयला लावली. लोक हसतात ना हसू देत, पण तू सायकलवरूनच शाळेत गेलं पाहिजेस. असं ते सांगायचे. आपण धीट बनून रहायला पाहिजे, मग बाकीचे काही का म्हणेनात हे त्यांचं ठाम मत होतं.
वडिलांप्रमाणे माणे आईचाही माझ्यावर प्रभाव आहे मी मोठी असल्यानं साहजिकच आईला बरीच मदत करायचे, पण ही मुलगी असे म्हणून तिनं घरकामात मदत केलीच पाहिजे अशा पध्दतीनं कधीचं विचार केला नाही. हे घरातल मोठं मूल आहे. त्यामुळे आई-वडिलानां घरकाम, बाजार, इतर बाहेची कामं यात त्यांना मदत करायला हवी अशा पध्दतीनंच तिनं याकडे पाहिलं. माझे आजोबा माझ्या लहानपणीच वारले. पण आपल्या नातवंडांनी गणितात पुढं यावं अशी त्यांची फार इच्छा होती. मी पहिल्यापासून हुशार आणि गणिताची आवड. त्यामुळे होते तो पर्यंन्त त्यांनी मला गणित शिकवलं. माझ्या आत्याची, काकांची मुलंही त्यांच्या अवतीभोवतीच असायची. त्यांना मात्र ते कधी गणित शिकवायचे नाहीत. विचारलं तर म्हणायचे, अरे, तिला गणिताची आवड आहे म्हणून शिकवतो. तुम्हाला ज्याची आवड आहे ते तुम्हालाही शिकवीन, या सगल्या मुळं मुलगी म्हणून मला काही वेगळं वागवल जातंय असं कधीच जाणवतं नाही. तुझ्याकडं हे हे गुण आहेत. ते वाढवण्यासाठी तू प्रयत्न केले पाहिजेस. आणि दोष आहेत ते सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे असचं मला सतत सांगितलं.
आय.ए.एस.मी झाले ते मात्र काहीशी अपघातानंच. इंटर सायन्सला मला गणितात ९७, भौतिकशास्त्र ८७ असे सगळया विषयात चांगले मार्क होते. माझा कल बघून तू संशोधनाकडं वळ असा मला खूपजणांनी सल्ला दिला. मलाही तो पटला. थोडे दिवस मी मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजीत संशोधनही केलं. त्यावेळेस मी हॉस्टेलवर रहायची. माझ्या ३-४ मैत्रिणींनी आय.ए.एस.ची परीक्षा द्यायची ठरवल्यावर त्यांचं बघून मीही ती परीक्षा दिली.
महाराष्ट्रात आय.ए.एस.ची परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं, त्याचा अभ्यास काय असतो, पास झल्यावर पुढं काय करावं लागतं याची कुणाला फारशी माहिती नाही. त्यामुळे हुषार मुलं-मुलीही इकडे फिरकत नाहीत.पण उ.प्रदेश, कलकत्ता, मद्रास, दिल्ली, बिहार या ठिकाणी आय.ए.एस.ला बसणारी मुलं ही दुर्मिळ बाब नाही. हुषार लोकांनी ही परीक्षा द्यायची असं जवळजवळ ठरूनच गेलेलं असतं.
मी लेखी परीक्षा दिली आणि पुढल्या गोष्टी झपाटयानं घडल्या. याचं सुमारास माझं लग्न ठरत होत. त्यावेळेस लेखी परीक्षेचा निकाल अजून आला नव्हता. पण सासरच्या लोकांना अशी परीक्षा दिली आहे याची आधीच कल्पना दिली होती. त्यांनीही तुला यात करिअर करायचं तर कर खुल्या मनानं सांगितलं होतं
लेखी परीक्षा पास झाल्यावर मला मुलाखतीचं बोलावणं आलं. महाराष्ट्र राज्य देण्यांत आलं आणि पुण्यालाच उपजिल्हाधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली.
या सगळया गोष्टी इतक्या भरभर घडल्या की मागं वळून पहाणं, किवां थोडंसं थांबून विचार करणं हे जमलंच नाही.
याबाबतीत मी फार सुदैवी असं म्हटलं पाहिजे. माझ्या एका सहका-याच्या मुलीनंही आय.ए.एस.ची परीक्षा दिली होती आणि तिची निवडही झाली होती. पण तिचं जिथ लग्नं ठरलं होतं त्या घरच्यांनी तिला या क्षेत्रात करिअर करायला आक्षेप घेतला आणि विशेष म्हणजे ती मुलगीही हे सगळं सोडायची कबुली देऊन लग्न करून मोकळी झाली माझ्याबाबतीत मात्र हे घडलं नाही. खरं तर आय.ए.एस.साठी निवड झाल्यावर कुठं काम करावं लागतं, बदल्या फार होतातं का याची कुणालाच कल्पना नव्हती. ती आल्यावर मात्र सगळयांनीच आनंदानं ते स्वीकारल माझ्या सास-याना तर उलट माझा फार अभिमान वाटतो.
आमचं लग्न ७४ साली झालं. मेहेदळे तेव्हा कलकत्याला फिलिप्स मधे होते. मला बंगाल राज्य मिळालं तर त्यांनी तिथच राहायचं, महाराष्ट्र मिळालं तर पुण्याला बदली करून घ्यायची असं आमचं ठरलं होतं. त्याप्रमाणं त्यांनी पुण्याला बदली करून घेतली मलाही सुरूवातीला पुण्या-मुंबईला रहायला मिळालं नंतर मात्र कांही वर्ष मी बाहेरगावी राहिले. पण सगळं व्यवस्थित जमून गेलं.
जरा वेगळया पध्दतीचं क्षेत्र मी काम करायला निवडलं तरी त्यात बाई म्हणून मला काही त्रास झाला नाही. सुरूवातीलस तुमचं प्रशिक्षण हे प्रत्यक्ष जिलधिका-यांच्याच देखरेखीखाली चालू असतं, दौरे वगैरे सुध्दा गाडीतूनच करावे लागतात. त्यामुळं काहीच अडचण येत नाही. आणि नंतरही तुमची जी नेमणूक होते ती इतकी उच्च पदावर असते की बाई म्हणून वाट्याला उपेक्षा यायचा प्रश्नच उद्भवत नाही. अर्थात्‌ नवीन असतानां अनेक गोष्टी माहित नसतात. पण त्या गोष्टी तुम्ही किती पटकन शिकता, त्या शिकायची तुमची किती इच्छा आहे यावर खूप काही अवलंबून असते. हाताखालचे जे अधिकारी असतात, ते १५-२० वर्ष या कामात मुरलेले असतात. त्यामुळे त्यांचं बरोबर लक्ष असतं. एखाद्या वरिष्ठ पुरूष अधिका-याला जर कळत नसेल तर साहेबांना कळत नाही एवढंच ते म्हणतील पण बाई जर हे सगळं समजावून घ्यायला कमी पडली तर बाई आहे म्हणून कळत नाही. असा थोडा टवाळकीचा सूर त्याला मिळतो. पण एकदा हया सुरूवातीच्या कसोटीतून तुम्ही पार पडलात तर मात्र सगळयांची तोडं बंद होतात.
माझे सहकारी माझ्याशी चांगले वागतात ते मी बाई म्हणून वागतात की नाही हे मला माहित नाही, पण छोट्या गावातून मी फिरते तेव्हा बाई असल्याचे चांगले अनुभव मला येतात. एक तर आम्हाला जो जबरदस्त अधिकार असतो त्याची गावात जाणीव असते. प्रत्येक ठिकाणी मी गाडीनं जाते, माझ्याबरोबर शिपाई असतो. हाताखालचे किमान तीन क्लार्क तरी असतात. त्यामुळे शिक्षिका किवां नर्स म्हणून काम करणाया बायकांना लहान गावात जो त्रास होतो त्याचा अनुभव मला येत नाही. उलट लोकं खूप आदराने वागवतात. पुरूष अधिका-यांसमोर ते आपल्या अडचणी मोकळेपणाने कशाचीही भीड न ठेवता सांगून मोकळे होतात. पण स्त्री अधिकारी म्हटल्यवर ते मोकळेपणी बोलले तरी त्यात एक अदब असते. आपल्या बोलण्याने समोरची बाई दुखावली जाऊ नये म्हणून ते सावध असतात.
अर्थात्‌ जिथं अधिकार असतो, तिथं त्याचा दुरूपयोग आलाच असं म्हटलं जातं हे मात्र सरसकट खरं मानता येणार नाही. जे कडक, कसल्याही मोहाला बळी न पडणारे म्हणून प्रसिद्ध असतात, त्यांच्या वाटेला कुणी जात नाही आणि स्त्रियांच्या बाबतीत तर भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप कमी असतं असं मला वाटतं. अर्थात्‌ त्याचं एक कारण हे असू शकेल की, पुरूषं अधिका-यांना पार्टी द्यायच्या निमित्ताने किवां अशाच पध्दतीने सहजपणे ऍप्रोच करता येतं. स्त्री अधिका-यांना तसं करता येत नाही. पण तुमचा लौकिक कसा आहे हे सगळयात महत्वाचं. मग तुम्ही पुरूष असा किंवा स्त्री. आणि या मोहातून सुरूवातीलाच सावरावं लागत. एकदा त्यात वहावत गेलं तर मग स्वतःला सुधारणं फार कठीण जातं.
एवढया मोठया अणिकारपदावर असल्यानं एखादं का करून घेण्यासाठी दडपण आणण्याचा प्रयत्नही खूप होतो. पण त्यांना बळी पडतात ते दुबळे असलेलेच. तुमचा चांगला लौकिक तयार झाला की लोक चार हात लांब रहातात. तुमच्यावर असं दडपण यायचा प्रसंग तर होणारच नाही, उलट आपल्यावरच उलटी कारवाई होईल अशी भीती लोकांना वाटेल. अर्थात्‌ कुणालाही जुमानायचं नाही हा दृष्टिकोनही चुकीचा आहे.

आज इतकी वर्षं घर आणि करियर यांचा तोल मी व्यवस्थित सांभाळू शकले याचं कारण मी दोन्ही गोष्टीना सारखचं महत्व दिलं नोकरीच्या बाबतीत मी कणीही कसलीही कसूर केली नाही. मग ते रात्री ११ पर्यंत काम करणो असो वा पहाटे ४ वाजता उठून कुठं दौ-यावर जाणं असो. पण या वेळा नंतर मुलांचा अभ्यास, घरातल काही काम या गोष्टीही मी तितक्याच आवडीन करते. नुसती करियर करूनही चालत नाही, आपल्या घराला काही सवयीही आपणच लावाव्या लागतात. त्या लावण्यासाठी घरच्यांचा हातभार किती लागतो हे महत्वाचं आहे आणि त्याबाबतीत मी खूपच सुदैवी आहे. माझे सासु-सासरे आमच्या जवळ रहात नाहीत. पण जेव्हा येतात तेव्हा तेही समजून मदत करतात. मी उपजिल्हाधिकारी होते तेव्हाची गोष्ट मला आठवते, तेव्हा निवडणुका होत्या. आणि रिटर्निंग ऑफिसर म्हणून माझी नेमणूक झाली होती. निवडणुका पार पडेपर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणं मला भाग होतं. त्यावेळेस माझा मुलगा ४-५ महिन्याचा होता. एवढा वेळ बाहेर घालवल्यावर त्याच्याकडे, घराकडे बघणं मला शक्यच नव्हतं. त्यामुळं मग तीन महीने त्याला माझ्या आईनं सांभाळयं.
यादृष्टीने मेहेदळयांच्या सहभागही खूपच मोठा आहे. लग्नानंतर काही वर्षांनी सुमारे ४ वर्ष मला बाहेगावी रहावं लागलं. तसं इतर कुठलं पद स्वीकारलं असतं तर मला पुण्यालाही रहाता आल असतं. पण जिल्हाधिकारी म्हणून काम करायचं असेल तर मात्र कुठंही जायची तयारी असावी लागते. माझी ती होती आणि त्यांनीही त्याला कधी आक्षेप घेतला नाही. मुल मात्र त्यावेळेस माझ्याकडेच राहिली. पण एकतर तेव्हा ती खूप लहान होती आणि गाडी, शिपाई अशा सोयी असल्यानं मला त्यांना
सांभाळणं अधिक सापं होतं आता मुलं मोठी आहेत. मी दौ-यावर गेले तर मुलांची जबाबदारी त्यांच्याकडेच असते.
घरकामाच शेअरिंगही व्यवस्थित आहे सगळयात महत्वाचं काय, तर दोघामध्ये सांमजस्य असणं. ते असलं आणि एकमेकांच्या कामा बद्दल आदर, आपुलकी असली की या गोष्टी सहज जमवता येतात.
मात्र हे सामंजस्य नसलं, व एकमेकांच्या कामाबद्दल आदर नसला तर मात्र गोष्टी अवघड़ होऊन बसतात. आणि एकमेकांच्या कामाबद्दल आदर असणं म्हणजे बायकोनं बाहेर जाऊनच काम केलं पाहिजे असं नाही. घरकाम हेही तितकंच महत्वाचं आहे , त्यालाही कष्ट पडतात. ते उपसण्यांत इतरांची साथ मिळण हे त्या त्या घरातल्या संस्कारांवर, वातावरणावर अवलंबून आहे. त्याकडे दुर्लक्षही करता येत नाहीत कारण शेवटी घर म्हणजे हॉटेल नव्हे.
याबाबतीत एक मुद्दा मला असा मांडावासा वाटतो नोकरी करणाया व्यक्तीत दोन प्रमुख वर्ग असतात. पहिला गरज म्हणून नोकरी करणाच्या व्यक्ती आणि दुसरा, काहीतरी करायची उर्मी आहे म्हणून नोकरी करणा-या व्यक्ती.
here onward not yet corrected.
पहिल्या वर्गातल्या व्यक्तीना व्यक्ती एखादी गोष्ट आली पाहिजे म्हणून करिअर करतात. त्यामुळे त्यांना कामात आनंद मिळतो. त्याप्रमाणं घरकामातही काहीजणानां आनंद मिळतो. काहीना नाही.
हे सामंजस्य जिथं नसेल तिथं ते निर्माण करावं लांगतं, मोकळा संवाद करावा लागतो. घर चालवण्यासाठी पडतं जसं घ्यायला हवं, तसचं स्वतःची मात ठामपणे मांडायचा धीटपणाही स्त्रीकडे हवा. हा धीटपणा आज आपल्या बहुसंख्य स्त्र्िायात दुर्दैवाने दिसत नाही. आजच्या स्त्रीमुक्ती चळवळीनंही स्त्र्िायांना धीट बनण्यावर जास्त भर घायला हवा असं मलावाटतं माझा या चळवळीतल्या कुठल्याही गंटाशी संघटनेशी संबंध नाही. पण देशातल्या इतर प्रश्नांसारखेच स्त्र्िायांचे प्रश्नही समजावून ध्यावेत असंमला वाटतं आणि ते सोडाण्याची संधीही काही प्रमाणात मला मिळाली सांगली जिल्हाताल्या जत गावात यल्लमा मंदिर आहे. तिथ देवादासी म्हणून मुलींना आणून सोडण्याचे प्रकार चालायचे. जिल्हाअधिकारी असल्यामुळं गावातल्या लोकांना पोलिसांचा धाक वगैरे दाखवून मी हा प्रकार बंद करवला.मी दोन वर्षं तिथं होते त्या काळात हे प्रकार घडले नाहीत, पण या वर्षी मी पुण्याला आल्या वरही त्या ठिकाणी हा प्रकार झालेला नाही हे महत्वाचं मी तिथं होते. त्यांच्या दीक्षा द्यायच्या दिवशी पौष पौर्णिमेला मी कॅप घ्यायचे. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्रोग्राम करणाच्या बायकांना कर्ज, कच्चा माल, मशिन या सगल्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या .....इथं पश्च्िाम महाराष्ट्र विकास महामंडल आल्यावर इथेले अधिकार वापरून मी या केंद्रला दहा हजारे रू.चा कच्चा माल पाठवला. त्या बायकांनी तयार केलेल्या वस्तू आधी विकत घेतल्या पंधरा देवदासी आणि सात इतरजणीनी आमचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता गडहि ग्लजलाही असंच केंद्र उभारायला आम्हाला मान्यता मिळाली आहे.
स्त्रीमुक्ती चळवळ जर खाल पर्यंत पोचवायची असेल तर अशा प्रकारे त्या स्त्र्िायांना आर्थिक आणि शैक्षणिदृष्टया एका पातळीवर ठेवायची गारज आहे. नसुत्या भाषाणंनी हे काम होणार नाही असं
मला छामपणे वाटतं.
मी जे थोडंफार देवदासी प्रथविरूध्द करू शकले त्यावरून माझी अशी खात्री झालीय की आपण स्त्री आहोत म्हणून एखी मिळाली असती ती संधी आपल्याला मिळत नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा. त्याची इतर काही कारणं असू शकतात याकडे डोळेझाक करतो. आपलं कुठं चुकतंय का हे ठरवण्यासाठी आत्मपरीक्षण आपण करू शकत नाही. आपण स्त्री म्हणून आपन्याला अमुक संधी नाकारली गेली पुंढही असचं होणार अशा पध्दतीनं विचार व्हायला लागला की मग
वैफल्ययेतं, न्यूनगंड निर्माण होतो. स्त्रीम्हणून काही गोष्टी नाकारज्या जातात हे मलाही कबूल आहे. पण मग मागासवर्गीय म्हणून, परप्रांतीय म्हणून, अधिकारपदावरच्या व्यक्तीला अनुकूल नाही म्हणून अशा इतर कारणानीही अनेकदा काही संधी नाकारल्या जातात. जवळजवळ प्रत्येम क्षेत्रात हे घडतं त्यामुळं आजच्या स्त्रीमुक्ती चळवळीत आम्ही बाई म्हणून आमच्यावर अन्याय होतो. यावर जोभर दिला जातो तो मला चुकीचा वाटतो. हे जर टाळलं तर ही चळवळ अणिक ग्रेसफुल होईल आणि अधिक प्रभावी ठरेल याची मला खात्री आहे.

No comments: