Saturday, February 13, 2021

तरूण विचारांचे वारे

 

तरूण विचारांचे वारे!



जच्या तरूण मुला-मुलींबद्दल तुम्हाला काय वाटत?

अलीकडे मी कुठेही गेले तरी, हा प्रश्न मला हमखास विचारला जातो. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ‘तरूण पिढी म्हणजे माझीच पिढी’ असे मला वाटत असे, त्यामुळे ‘तुम्हाला काय वाटते?’ या प्रश्नांचे उत्तरही माझ्याकडून अगदी भरभरू न दिले जाई.

पण लवकरच दिवस बदलले. माझी मुले मोठी झाली. त्यांच्या-माझ्या संवादाचे स्वरुप बदलले. नेहमीच्या बोलण्यात मैत्रीच्या ऊब असणारे ‘नवे नाते’ जाणवू लागते. माझ्या घरात एका नव्या पिढीचा, नव्या स्वप्नांचा जन्म होताना पाहणे, हा विलक्षण रोमांचक अनुभव आजही मी घेते आहे. या अनुभवातून जात असतानाच लक्षांत येते की आता आपली पिढी जुनी झाली. नवी आशा, नवी स्वप्ने घेऊन नव्या पिढीने जगायला सुरुवात केली आहे! आणि ती आक्रामक अशी पिढी आहे. आम्हाला समजावून सांगा, पण तुमचे मत लादू नका, प्रसंगी आम्ही आमची मते मांडण्यासाठी वकील म्हणून तुमची नेमणूक करू, पण आमची मते बनविण्याचा अधिकार आमच्याकडे ठेवू, अशी या पिढीची भाषा आहे.

त्यामुळे अलीकडे ‘तुमची पिढी आमची पिढी’ असे शब्द अगदी सहज माझ्या बोलण्यात येतात आणि नंतर माझे मलाच आश्चर्य वाटायला लागते.

हा बदल कधी आणि कसा झाला, हे सांगता येणार नाही, पण एवढे खरे, की माझी ‘भूमिका’ बदल्याचे मला स्पष्टपणे जाणवते आहे.

एकदा भूमिका बदली, आणि आपण “मागच्या पिढीत” जाऊन बसलो की आपण पुढच्या पिढीला नाकारायला सुरुवात करते. हे चित्र मी अनेक ठिकाणी पाहिले आहे.

अशी ‘नकारात्मक’ भूमिका स्वीकारली की नव्या पिढीशी नातेच तुटते. ‘सांगीन गोष्टी युक्ताच्या चार’ असे म्हणत सहजपणे रूळ बदलणारी माणसे फार थोडी, शिवाय जुन्या युक्तीच्या गोष्टी नव्या जमान्यात चालेनाशाही होतात, पण त्यांच भानही ज्येष्ठ पिढीला असतेच असे नाही.

नव्या पिढीशी ‘मैत्री’ मला आवडते, गरजेची ही बाटते. त्यांच्या आयुष्याबद्दल माझ्या मनात विलक्षण कुतूहल आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या बी.वाय.के कॉलेजमध्येएका छोट्या समारंभासाठी मी प्रमुख वक्त्या या नात्याने उपस्थित होते. कार्यक्रम फक्त ‘भाषणबाजीचा’ असू नये हे मी आधीच ठरविले. नाशिकच्या भविष्यकाळातबद्दल कॉलेज सुवक-सुवतींना काय वाटते, हे जाणून घ्यावे असा मुख्य उद्देश होता. संयोजक, प्राध्यापक मंडळींशी बोलून आधी सारे नक्की केले होते.

मोठ्या हॉलमध्ये निवडक मुला-मुलींचा एक गट, एफ.वाय.बी.कॉमपासून एम.. पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला. तरूण, हसरे चेहरे. विलक्षण उत्साह आणि चैतन्याने भरलेले.

बहुसंख्य मुले नाशिकची होती. नाशिकमध्ये शिकत होती आणि भविष्यातही नोकरी-व्यावसायासाठी येथेच राहण्याची शक्यता होती. त्यांना विषय दिला होता ‘येत्या 20 वर्षात नाशिक कसे असावे? कसे दिसावे ? असे तुम्हाला वाटते ?’ या विषयाला आणखी स्पष्टता यावी म्हणून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उद्योग आणि पर्यटन या मुद्य़ांच्या आधाराने मुलांनी बोलावे असे मी सुचविले होते. येत्या वीस वर्षात तुम्ही काय योगदान करू शकता असाही उपप्रश्न होता.

चर्चा सुरु झाली.... मुलांसाठी सर्वात जिव्हाळ्याचा मुद्दा होता शिक्षण! त्यांच्या मनात इतके साचले होते की हवेने तट्ट फुगलेल्या फुग्याला टाचणी लावण्याचे निमित्त व्हावे, तसे झाले! त्यातही सगण्यात ज्वलंत मुद्दा होता कॅपिटेशन फीचा! एका हाताने इतके लाख द्या, आणि दुसऱ्या हाताने अडमिशन मिळवा असे जाहिरपणे सांगणाऱ्या व्यवस्थेबद्दल धुमसणारा राग व्यक्त करायला त्या तरुण मुलांकडे शब्द पुरत नव्हते.

अमुक लाख रुपये दिल्याशिवाय आम्हाला हवी तिथे अडमिशन मिळत नाही. आधी पोत्यांनी मार्क मिळवायचे आणि वर लाखो रुपयांची दक्षिणा! हे करून आम्ही जगायला बाहेर पडू तेव्हा आमच्याकडून तुम्ही कसल्या सामाजिक बांधिलकीची अपेक्षा करता आणि का म्हणून? ’ हा त्या मुलांचा पहिला प्रश्न होता. वशिलेबाजी आणिपॉपिटेशन फीचे जंगल तुडवून बाहेर पडणाऱ्या मुलांची सामाजिक बांधिलकी केव्हाच संपलेली असते, हेही मुलांनी स्पष्टपणे सांगून टाकले. कालबाह्य शिक्षण

त्यांचा दुसरा मुद्दा होती व्यावसायिक शिक्षणाचा! हे शिक्षणक्र आपल्या शाळा-कॉलेजमध्ये कधीच धडपणे राबवले जात नाहीत, अशी त्यांची तक्रार होती. विद्यापीठांतच्या अभ्यासक्रमातून फक्त पुस्तकी शिक्षण दिले जाते, त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध नसतो ही आता सर्वसामान्य वस्तुस्थिती आहे. पण त्या मुलांनी आणखी पुढे जाऊन.....

पुस्तकी’ असतेच, पण ते अत्यंत जुनाटही असते! इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स शा क्षेत्रांमध्ये रोज नवे बदल घडतात, पण आपल्या शिक्षणपद्धतीला, महाविद्यालयांना, प्राध्यापकांना त्याचा गंधसुद्धा नसतो. दहा वर्षापूर्वीची पुस्तके हाच ‘सिलॅबस’ आणि तोच शिकवायचा!

पण एखाद्या क्षेत्रात नवे काय घडले आहे हे मुलांना माहित असते का? या माझ्या प्रश्नावर अनेकांनी आत्मविश्वासाने होकारार्थी उत्तर दिले. त्यांना बाहेरच्या जगाचे ‘एक्सपोजर’ जास्त मिळते. जे वाचन करतात, त्यांचे वाचनही जास्त विस्तारलेले असते. मुख्य म्हणजे जगात नवीन गोष्टी घडत आहेत, तंत्रज्ञान अफाट वेगाने पुढे जात आहे हे कानांवर तर पडतच असते. इलेक्ट्रॉनुक्समध्ये ‘आयसी’ बाबत शिकवण्याऐवजी व्हॉल्व्ह किंवा फार तर सेमी कंडक्टर आधारित सर्किट शिकविणे किंवा कॉम्प्युटर कोर्समध्ये ‘सी’ आणि ‘विंडोज’ ऐवजी अजूनही बेसिक, कोबोलसारख्या भाषेपर्यंत येऊन थबकणे हे दोन्ही कशाचे द्योतक आहे? आपला शिक्षणक्रम तंत्रज्ञानाच्या पुढे जाणारा नसला तरी निदान त्याच्या बरोबरीने जावा. कॉम्प्युटरच्या जगात दर सहा महिन्यांनी नवे बदल घडत असतील, पण विद्यापीठाचे सिलॅबस पाट वर्षांनी बदलणार असेल तर आपले शिक्षण अप-टू-डेट कसे राहणार? असा मुलांचा प्रश्न होता.

नव्या घडामोडी मुलांकडून प्राध्यापकांकडे आणि प्राध्यापकांकडून (सवडीने) विद्यापीठाकडे पोहचतात. मग विद्यापीठ जागे होते आणि सिलॅबसमध्ये असा बदल करते की जगाने केव्हाच चो बदलही ‘जुनाट’ म्हणून मोडित काढलेला असतो! हे सारे रोखठोकपण सांगणाऱ्या मुलांमधील नाराजी फार स्पष्टपणे जाणवली.

हुशारीचे वादग्रस्त निकष

चर्चा मग अपरिहार्यपणे वळती ती मेडिकल आणि इंजिनीअरिंगकडे! उपस्थित मुलांमध्ये जवळजवळ प्रत्येकजण वाणिज्य शाखेत शिकणारा, पैकी काहीजण दोन-तीन टक्क्यांचा फरक पडल्याने, सायन्सचे दरवाजे बंद शाले म्बणून कॉमर्सकडे नाराजीनेच आलेले. मार्कांच्या ‘रेटरेस’ बद्दलची चीड या मुलांमध्ये जास्त तीव्र दिसली, पण हेही जाणवले की आज ते घेतात त्या शिक्षणक्रमातून त्यांना अनेक रस्ते, दिसताहेत. ‘डॉक्टरच’ किंवा ‘इंजिनिअरच’ असे झापड डोळ्यांवरून निघून पडल्यामुळे बाहेरच्या जगात करिअरची इतर दालने आहेत ती त्यांना कळली आहेत.

एक मुलगा म्हणाला, “डॉक्टर होईल तो सर्वात हुशार. इंजिनिअर म्हणजे त्याच्यापेक्षा कमी. पण हुशारच! बाकीचे सगळे त्यांच्यानंतर. हुशारी मोजण्याचा हा प2रामीटर कधी बदलणार आपण?”

आणखी एकाने सांगितले, “जो सर्वात जास्त पैसे मिळवील तो जास्त हुशार, असेही असतेच ना?”

लाख रुपये पर डे’ हे टारगेट गाठायचे म्हणजे मग मेडिकल स्टुडंटस्मध्ये पण रेस असतेच. जनरल प्रक्टिशनर होउन काही फायदा नाही, व्हायचे ते सर्जनच आणि त्यातही कार्डिक सर्जन झाले म्हणजे ‘टारगेट’ लवकर गाठता येते. या मनोवृत्तीसाठी कोर्सेससाठी पळापळी चालली आहे. जितका कोर्स महागडा, तितका जास्त पैसा तो कोर्स संपविल्यानंतर मिळवावा लागणार!

नव्या व्यवस्थेचे हे नवे तत्वज्ञान चुकीचे आहे असे मुले बोलत होती. साहित्य, कला या विषयांचा संबंध हुशारीशी जोडला जात नाही. खेडेगावांतील शाळेतून आलेल्या व हे विषय घेणाऱ्या मुलांची नंतर फार घुसमट होते. गावाकडूल शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या वस्तुस्थिती समजावून देऊन त्यांना करिअर गाईडन्स देऊ शकतील अशा संस्था नाशिकात येत्या दोन-पाच वर्षात उभ्या राहिल्या पाहिजेत. अशीही सूचना पुढे आली. अशी संस्था कुणी काढली तर कॉलेजातील दुसऱ्या, तिसऱ्या वर्गाचे विद्यार्थीच “बेस्ट फॅकल्टी” ठरतील असेही त्यांनी सांगून टाकले.

कॉपिटेशन फीबद्दल जळफळाट

चर्चा वारंवार सरकत होती ती डोनेशन आणि कॅपिटेशन फीकडे! या गोष्टीबद्दल बोलताना होणारा जळफळाट मुलांच्या चेहऱअयावर, हातवाऱ्यांमध्येही दिसत होता.

एक मुलगा म्हणाला, “आपण साखरसम्राटांना नाव ठेवतो. हल्ली परिस्थिती अशी आहे की एक शिक्षणसम्राट पाच साखरसम्राटांना विकत घेईल!”

ही माणसे आमच्या नावावर मान्यता मिळवतात, आमच्या बळावर पॉलिटिक्स करतात, आणि पैसा तर काय आमचाच असतो. मग पैसे वाजवून घेता तर चांगल्या क्वालिटीचे शिक्षँण तरी द्या ना! त्याचे तर नाव नाही.”

उसळून बोलणाऱ्या एका मुलाला मी म्हटले, “पण कॉपी करून देतात ना!”

तेव्हा सारी मुले सुचक हसली. कुणीतरी बोलून टाकले, “पण मॅडम, कॉपी करायलं देणं म्हणजे चांगलं शिक्षण नव्हे, हे आम्हालाही कळतं....”

दळण दळणे’ नको वाटते !

मेडिकल- इंजिनिअरींगच्या या चक्रातून सुटायचे असेल, तर काय करायला हवे?

या प्रश्नावर मुले म्हणाली, “नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कौन्सिलींग सेल्स’ निर्माण करा. संधी देणार असाल तर आम्हीही त्यात स्वयंस्फूर्तीने काम करु, पण कॅपिटेशन मोजून, मार्कांच्या मागे जीव खाऊन पळण्यापलीकडे काही शिक्षण आहे हे विद्यार्थ्यांना, त्यांच्या आई-बापांना कळू द्या!”

स्वतःच्या करिअरची दिशा निवडण्यासाठी या मुलांना सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज वाटते आहे. जे नवे आहे, भविष्यकाळात टिकणारे आहे, असे काही त्यांना शिकायचे आहे. अभ्यासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे तेच दळण दळत राहणे त्यांना फारच ‘बोअर’ वाटते. त्याचप्रमाणे असे मार्गदर्शन त्यांना स्वतःला मिळाले नसले तरी आपल्या मागून येणाऱ्यांना तरी ते मिळावे अशी तळमळही त्यांना होती हे दिसून आले.

अनेकांना ‘इंडस्ट्री’ मध्ये जाण्याची इच्छा आहे, तिथेही इंजिनियर्स खेरीज इतरांची गरज असते ना? पण त्यासाठी काय करायला हवे ते माहीत नाही. उद्योजकांना त्यात मोठी भूमिका करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

शाळेत मुलांना कितीतरी जुनाट शिकवतात. ज्यांना काहीच जमत नाही, त्यांना प्राथमिक शाळेत शिक्षक व्हायचे, अशी आपल्याकडे प्रथाच पडली आहे. त्या शिक्षकांपेक्षा आम्हीसुद्धा शाळेतल्या मुलांना उत्तम शिकवू”- कुणीतरी म्हणाले.

तुम्हाला खरोखरीच परवानगी मिळाली तर शाळेत जाऊन शिकवाल का आजच्यापेक्षा जास्त योग्य आणि उपयोगी असे काही तुमच्याकडून विद्यार्थी शिकतील का?” या प्रश्नावरही त्यांचे उत्तर ‘हो’ असेच होते.

आम्हाला झोपडपट्टीतल्या मुलांसाठी काम करावसं वाटतं. आमच्या कॉलेजने प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, तर आम्ही मनापासून काय करू” मुलींच्या एका गटाने सांगितले.

एवढे होईपर्यंत बराच वेळ उलटून गेला होता. शिक्षणाखेरीज बाकीच्या मुद्यांना जाता जाता स्पर्श होत होता तेवढेच! पण कुठूनही सुरुवात तरी करा या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले.

अशी सुरुवात या नाशिकांत घडवून आणणे ही आपणा सर्व नाशिककरांची जबाबदारी आहे. मुक्त विद्यापीठातर्फे आम्ही एक पाऊल टाकीत आहोत. तो आहे झोपडपट्टीतील मुलांसाठी सायंशाळा. याला सर्वांचा हाताभार लागो.



No comments: